Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे. ...
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पवारांनी भारतीय जनता पार्टीला असलेला आपला प्रखर विरोध अनेकदा दाखवून दिला होता. त्यांचा भाजपाविरोधाचा चेहरा आता पुरता फाटला आहे. ...
शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे, असे सांगत नार्वेकरांनी अजित पवारांच्या अपात्रतेवरही भाष्य केले आहे. ...