द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Nashik News: अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. ...
एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...
कायम दुष्काळी तालुका अशी जतची ओळख आहे. पण, याच जत तालुक्यात प्रयोगशील शेतकऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जत येथील प्रगतशील शेतकरी सिकंदर पटाईत यांनी सिडलेस क्रिमसन वाणाची द्राक्ष लागण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
प्रतिकूल हवामान, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकरी एक टनाचा उतारा कमी झाला. ...