द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ...
बेदाणा सौद्यावेळी केवळ साडेसातशे ग्रॅमपर्यंतच तूट धरण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी तासगाव बाजार समितीने बोलावलेल्या अडते व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
यंदाच्या वर्षी Bedana बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून मागणीच होत नसल्याने सरासरी दर दीडशे रुपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे राज्यात सुमारे दोन लाख मे. टन बेदाणा अद्याप पडूनच आहे. ...
बाजारात bedana market बेदाणाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने उठाव झाला नसल्याने स्टोरेज फुल आहेत. दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. ...
तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे. ...
बेदाणा सौदे ऑनलाइन झाल्यास उधळण पूर्णपणे थांबून लुटीला लगाम बसू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करून नियमावली तयार केली, तर वटाव कपातीच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीला लगाम बसू शकतो. ...
फुटीचा फायदा पुन्हा व्यापाऱ्यांना होणार आहे. या फुटीत अडते आणि शेतकऱ्यांनी आर्थिक कोंडी होणार आहे. याकडे सांगली आणि तासगाव बाजार समितीच्या प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ...