राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. ...
नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे. ...
Maharashtra Gram Panchayat Election Results: या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली. ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे. ...