राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नगरसूल : ह्यमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ दुकानदारांना देण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जात आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने ...
Gram Panchayat News : काही महत्त्वाची गावे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झाल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा मात्र हिरमोड झाला आहे. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणूक शपथपत्रात न्यायप्रविष्ट प्रकरणाची माहिती न दिल्याने मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...