जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ...
जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि मागील काही दिवसांपासून गंगाखेड परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरुन वाहत असून काही भागात या पाण्याने नदीपात्र सोडले आहे. ...
पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. ...
गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले. ...