संबंधित व्यक्ती आणि त्याचे कुटुंब इटलीहून भारतात आले होते. कोलकात्याच्या डमडम भागात राहणाऱ्या या व्यक्तीचे वय 55 वर्ष होते. या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सदस्य दक्षिण कोलकात्यातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. ...
शोएब म्हणाला, या घातक व्हायरसने एवढे गंभीर रूप धारण केले असतानाही येथील लोग सावध झालेले नाहीत. ते बिनधास्त आणि एकत्रितपणे रसत्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःला लॉकडाउन करून घ्यायला हवे. ...
आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
उत्तर प्रदेशातील आजमगडचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे. ...
फाशी टाळण्यासाठी पहाटे २.३० वाजेपर्यंत दोषींनी प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयाने ३ वाजेच्या सुमारास अखेरचा प्रयत्नही फेटाळून लावल्यानंतर फाशीवर शिक्कामोर्तब झाले. ...