धान हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून धान उत्पादन वाढीकरीता शेतकरी रासायनिक खते व इतर खतांचा वापर करतात तसेच काही शेतकरी हिरवळीच्या खतांमध्ये धैंचा, सोनबोरू, गिरीपुष्प लागवड करून चिखलणी करतांनी जमिनीमध्ये गाडतात. ...
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील उच्च शिक्षित शेतकरी विजय नामदेव जगदाळे व पत्नी प्रियंका विजय जगदाळे या दाम्पत्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर दीड एकर तैवान पिंक पेरू लागवडीतून पहिल्याच वर्षी २४ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. ...
पावसाळ्यात चिबूड, काकडी व तत्सम फळभाज्यांचे उत्पादन सर्रास अनेक शेतकरी घेतात. परंतु मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील लहू शांताराम खापरे यांनी कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, गतवर्षी चिबडाचे उन्हाळी पीक घेतले होते. ...
Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...
नोकरीच्या मागे न धावता आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी चार एकर क्षेत्रातील हळदीतून १७२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्या शेतकऱ्यास ३४ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. ...