यावर्षी काही भागात सुरुवातीला पेरणी झाली तर काही भागात पहिल्या पावसात पेरणी आटोपली. पेरणीनंतर शेतात तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडताच कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, तणनाशक फवारणी करूनही शेतातील तण गेले नसल्यान ...
Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...
अन्य पिकांच्या तुलनेत हळदीचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, आवक वाढताच भाव पाडले जात असून गेल्या दोन महिन्यांत हळदीचे दर प्रतिक्विंटल दोन हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ...
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कामासाठी स्थायिक झालेले विठ्ठल शिवराम कोळी यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या अडीच एकरांमध्ये ऊस बियाण्यातून पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
बिऊर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी अभिजित आकाराम पाटील यांनी आपल्या शेतात लाल कोबीच्या पिकाची लागवड केली आहे. शेतीतल्या या वेगळ्या प्रयोगासह चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ...
जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्यक्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. ...