सोयाबीनच्या वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर दर्जेदार बियाणे तयार केले तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील होईल. ...
नारळ, सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून मसाला पिके, केळी, अननस लागवड करण्यात येते. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही आंतरपीक शक्य आहे. कमी कालावधीत वर्षभर उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला व कंदपिकासाठी मोठा वाव आहे. ...
परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे. ...
गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील सुधीर ऊर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याने एकरात दोडक्याची लागवड केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं. किलोमागे ३० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश आहेत. ...
केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला. ...
Maharashtra Rain : नैऋत्य मान्सून संपला असला तरी ईशान्य मान्सूनच्या पावसाला तामिळनाडू आणि परिसरामध्ये सुरूवात झालेली आहे. पण राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...