कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले. ...
सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले. ...