देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिकेची निवडणुकी काँग्रेससाठी जड जाताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी न झाल्याने आंबेडकरांचा पक्ष स्वबळावर उतरला आहे. तर दुसरीकडे एमआयएममुळे मतविभाजनाची चिंताही वाढली आहे. ...
Akola Municipal Election 2026: काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ...
कर्नाटक काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत राज्यात एक सर्व्हे केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेवर टीका केली. काँग्रेस फक्त हरल्यावरच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचा आनंद साजरा करते. भाजपाने याला सोयीचे राजकारण म्हटले. ...
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे. ...