देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर देखील सत्ता पुन्हा मिळविण्याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदावरून उभय पक्षात जुगलबंदी सुरू झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या ...