औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
जुन्या शहरातील दंगलग्रस्त भागात अजूनही अनेक दुकानांमधील आग विझलेली नाही. राखेच्या खाली आग अजूनही जळत असताना रविवारी दुपारी अडीच वाजता एमआयएम नेते राजाबाजार भागात शंभरहून अधिक तरुणांसह दाखल झाले. त्यांनी ज्या दुकानांचे नुकसान झाले त्यांची पाहणी केली. ...
दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले. ...
दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले. ...
हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. ...