औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
दंगलीत दोषी कोण हे न बघता त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत रविवारी दिले. ...
हिंमत असेल, तर सरकारने खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आज येथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
दंगलप्रकरणी २४ जणांना अटक करून रविवारी (दि.१३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहंमद यांनी दिले. ...
हातगाड्या, फेरीवाले या मुद्यांवरून सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन गटांकडून करण्यात येत होता. या दोन्ही गटांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस सिटीचौक पोलिसांनी दाखविले नाही. ...
जाफरगेट परिसरातील आठवडी बाजार रविवारी भरलाच नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचे सावट या आठवडी बाजारावर दिसून आले. रविवारी बाजारात मोजून २३ भाजीविक्रेते आले होते. फळ, सेकंडहँड हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा विक्रेत्यांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवल ...
दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला ...