शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांतून मूल्यशिक्षण देणारी जि.प.ची वसार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:58 IST

ग्रामस्थांचाही सक्रिय सहभाग; कचऱ्यापासून खतनिर्मिती करून शाळा परिसरात फुलवली बाग, दोन वर्षे पटकावली स्काउट गाइड चॅम्पियनशिप

- जान्हवी मोर्येडोंबिवली : अंबरनाथ तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आणि विविध उपक्रमांद्वारे मूल्यशिक्षणाचे धडे देऊन गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम जिल्हा परिषदेची वसार शाळा करत आहे. यासाठी ग्रामस्थांकडून मिळत असलेल्या सहकार्यामुळे या शाळेची ‘न भूतो न भविष्यती’ अशी वाटचाल सुरू आहे. कचरा समस्येवर मात करण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुलवलेली बाग सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.अंबरनाथ तालुक्यातील ही शाळा १९४९ मध्ये सुरू झाली. सध्या येथे पहिली ते आठवीपर्यंत ३०८ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळेतील पदवीधर शिक्षिका मोहिनी बागुल या मुख्याध्यापक प्रमोद हेमा पाटील यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत आहेत. बागुल म्हणाल्या की, यंदा विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा परिसरातच कचºयातून बाग फुलवली आहे. या बागेत विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे आणि फुलझाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये अळुकंद, टोमॅटो, वांगी, भोपळा, कांद्याची पात, पालक, वांगी अशा अनेक भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांचा वापर ते शालेय पोषण आहारात करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळतो.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचीही सवय लागत आहे. निसर्गाला आपण थोडे दिले तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो याची शिकवण त्यांना यातून मिळते. सध्याची मुले ही मातीपासून दुरावली आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा शेतीकडे वळा असा संदेश यातून देण्याचे काम शाळा करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण आता जिल्ह्यातील सर्वच शाळांनी केल्याचे त्यांनी सांगितले.दर शनिवारी दप्तराविना शाळा भरते. या दिवशी विद्यार्थी टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेटकार्ड बनवणे, सुतळीच्या वस्तू बनवणे, गार्डन तयार करणे, शेतीच्या विविध पद्धतीची माहिती करून घेणे आदी गोष्टी केल्या जातात. ही शाळा आता संपूर्णपणे कचरामुक्त झाली आहे. यंदाची शिवजयंती गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत साजरी केल्याचेही त्या म्हणाल्या.नशाबंदीसाठी जनजागृतीशाळेत सुरुवातीच्या काळात पायरीपर्यंत कचरा पसरलेला असायचा. त्यात दारूच्या बाटल्यांचा समावेश असे. शाळेची ही अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक घरांत जाऊन कचºयाविषयक जनजागृती करण्याचे काम केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी महामंडळासोबत व्यसनमुक्ती करण्यासाठी विद्यार्थी काम करतात. लहानपणीच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरवल्यास त्यातून एक सदृढ समाज घडण्यास मदत होईल, अशी शाळेची त्यामागे भावना आहे. शाळेला त्यांच्या या कामात जनसेवा मंडळाचे प्रमुख रवींद्र वायले व त्यांचे सहकारी मदत करतात. येथील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हापातळीवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. अंबरनाथ तालुक्यातील मानाची ‘स्काउट गाइड चॅम्पियनशिप’ही दोन वर्षे पटकावून आदर्श निर्माण केला आहे.विद्यार्थ्यांसाठी कलादालनशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे यासाठी कलादालन तयार केले आहे. या कलादालानत विद्यार्थ्यांनी बनवलेली टिश्यूपेपरची फुले, फेकलेल्या ग्लासपासून झुंबर, पेपरपासून सायकल, भेटकार्ड, फुलदाणी अशा विविध वस्तू ठेवल्या आहेत. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहतो.या सर्व उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणग्राहकता, सर्वांसोबत मिळून मिसळून वागणे, एकमेकांना सहकार्य करणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा विकास करणे हे गुण वाढीस लागतात. ‘सब बढे , सब पढे’ हे वाक्य सर्वार्थाने साध्य करण्याचे काम या शाळेतून होत आहे. - मोहिनी बागुल,पदवीधर शिक्षिका

टॅग्स :Schoolशाळा