शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही, राष्ट्रवादीत येणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा

By महेश गलांडे | Updated: February 21, 2021 21:32 IST

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली.

ठळक मुद्देपुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील कथोरेंविरुद्धची लढाई ही प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच असली पाहिजे. कारण, त्यांचा अपमान होईल, असे ना शरद पवार वागले, ना आर.आर.पाटील वागले ना अजित पवार.

ठाणे - राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कामगिरी उत्तम आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोना काळातही चांगल काम सरकारने केलंय. आपल्या सरकारच्या काळात माजी मंत्री स्वर्गीय नेते आर.आर.आबा आणि मंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष या भागासाठी दिलं. नेवळी फाटा ते बदलापूरचा टर्न या भागात एकही खड्डा नाही. त्यावेळी, कथोरेंना प्रचंड पैसा या दोन्ही नेत्यांनी दिला. या असल्या लोकांनी आमचा पक्ष का सोडला हेच आम्हाला समजत नाही, असे म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीत सोडून गेलेल्या स्थानिक नेत्यावर टीका केली. तसेच, पक्षात यायचं असेल तर.. असे म्हणत इशाराही दिला. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील कथोरेंविरुद्धची लढाई ही प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच असली पाहिजे. कारण, त्यांचा अपमान होईल, असे ना शरद पवार वागले, ना आर.आर.पाटील वागले ना अजित पवार. ते काम करणारे आमदार होते, यात शंका नाही. पण, कामासाठी सहकार्य करणारा राष्ट्रवादी पक्ष तुमच्या पाठिशी उभा होता हे तुम्ही कसे विसरलात? असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला. कार्यकर्त्यांच्या मनात ही सल असते. केवळ एका तिकीटासाठी तुम्ही भाजपात गेला. त्यामुळेच, आशिष दामलेंसारख्या युवकांनी स्थानिक निवडणुका गंभीरतेनं घ्यायला हव्यात, कारण ह्या परिणामकारक असतात. 

भाजपात कोण गेले ते परत येतील, मग त्यांना महत्त्वाचं स्थान मिळेल, असा विचार आपण करु नका. त्यांना ते स्थान अजिबात देणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, ते मी पवारसाहेब आणि सुप्रिया सुळेंपाशी बोलून दाखवलंय. येणाऱ्यांनी यावं, आम्ही सर्वांचं स्वागत करु, तुम्ही आमच्याच घरातले आहात. पण, पुढच्या बाकावर बसायला मिळेल, हा विचार करुन येऊ नका. थोडंस दोन वर्षे तुम्हाला वेटींग करावं लागेल, असे आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना इशारा देत सांगितलंय. 

भाजप सरकार आरक्षण काढणार 

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आंदोलनजीवी शब्दावरुन आव्हाड यांनी टीका केली. गुरुदासपूरच्या निवडणुकीचा वृत्तांत सांगताना भाजपाचा तेथील पराभव हे वेगळेच संकेत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं. आपल्यावर श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे भुलभुलैया करण्याचं काम करतात, मोदी सरकारने देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा धडाकाचा लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं. ज्या संविधानामध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलाय, त्याचं संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. 

पेट्रोल दरवाढीवरुन टीका

अंबरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, येथील महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आपले ठाण्याचे खासदार कधी आले इकडे, कुणी सांगेल का? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवरही टीका केली, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन एकेकाळी ज्येष्ठ कलावंतापासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चडीचूप आहेत. भाजपा सरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे सांगत हे सरकार आरक्षणविरोधी असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा