शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

कोणत्या खटल्यांना प्राधान्य द्यायचे हे ठरवावे लागेल; न्या. अभय ओक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:59 AM

न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या खटल्यांना प्राधान्य द्यावे, याबाबतचे धोरण अद्याप तयार झालेले नाही. कोणत्या खटल्याना प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.

ठाणे : न्यायालयाने कोणत्या प्रकारच्या खटल्यांना प्राधान्य द्यावे, याबाबतचे धोरण अद्याप तयार झालेले नाही. कोणत्या खटल्याना प्राधान्य द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.शहरातील मो. ह. विद्यालय येथे शनिवारी सकाळी त्यांच्यासाेबत प्रश्नोत्तराचा तास रंगला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ग्रंथालीचे दिनकर गांगल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मं. गो., ॲड. संजय बोरकर यांनी त्यांना प्रश्न विचारले.ओक म्हणाले की, न्यायदानाचे काम हे निर्भयपणे, निःपक्षपाती आणि अलिप्तपणे करावे अशी संकल्पना आहे. तालुकानिहाय, जिल्हानिहाय न्यायालये ही खरी न्यायालये असल्याचे ते यावेळी म्हणाले. वकील आणि न्यायाधीश म्हणून काम करताना येणारा फरक सांगताना ते म्हणाले की, वकील म्हणून पक्षकाराची बाजू न्यायाधीशाला समजावून सांगताना मर्यादा येतात, पण न्यायाधीश म्हणून आपल्या विवेकबुद्धीला पटते आणि जे कायद्यात बसते असा आदेश काढता येतो. न्यायालयापेक्षा जी वेगळी शक्ती आहे ती योग्य न्याय देईल या संकल्पनेला १९५० नंतर स्थान नसल्याचे ते म्हणाले. कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मोफत कायदेविषयक साहाय्य या संकल्पनेसाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे.‘चांगले काम करण्याचा प्रयत्न’ठाणे : माझ्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे ओझे माझ्यावर आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाची कारकीर्द तीन वर्षे २६७ दिवस इतकी आहे. या कारकिर्दीत जितके चांगले काम करता येईल, तितके करीन, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अभय ओक यांनी केले.  ओक म्हणाले की, अनेक घटना अशा घडत असतात की त्यावेळी शाळेची आठवण येत असते. यावेळी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयातील काही प्रसंग सांगताना शाळेतील शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या जुन्या इमारतीचा फोटो पाहून शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.