शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तुम्ही नगरसेवक पाखंडी आहात - आयुक्तांनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:27 IST

घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ही पाखंडी आहात, असा आरोप केला.

उल्हासनगर - घनकचरा व्यवस्थापन कर ५० टक्के घेण्यावर स्थायी समितीत सहमती दाखवणाºया पक्षांनी घूमजाव केल्याने आणि नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत यू टर्न घेतल्याने ही करवाढ फेटाळण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नगरसेवकांवर तुम्ही पाखंडी आहात, असा आरोप केला. माझ्याविरोधात कुठली कारवाई करायची ती करा, असे खुले आव्हान त्यांनी नगरसेवकांना दिले.घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा झाली आणि तो नगरसेवकांनी फेटाळला. हा जिझिया कर असल्याचे मत शिवसेनेचे अरूण अशांत, सुनील सुर्वे, राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले. तर भाजपाचे नगसेवक प्रकाश नाथानी यांनी ३ वर्षात महापालिकेने कोणत्या प्रभागात मूलभूत कामे केली, त्यांची माहिती द्या. त्यानंतरच कर आकारा, असे सांगितले.महापालिकेचे उत्पन्न मर्यादित आहे. खर्च व उत्पन्नातील तूट दिवसेंदिवस वाढत आहे. घनकचरा व्यवस्थापन कर लावला नाहीतर मूलभूत सेवांव्यतीरिक्त इतर कामे होणार नाहीत, असा इशारा देत तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, असे आयुक्तांनी ठणकावले.अर्थसंकल्पातील काढली हवाआयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महापालिका अर्थसंकल्पावरच प्रश्नचिन्ह उभे केले. उत्पन्न व खर्चात ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प आजपर्यंत बनवला जात असल्याचे सांगितले.२०१४-१५ चा अर्थसंकल्प ५५० कोटीचा, प्रत्यक्षात उत्पन्न २९० कोटी. २०१५-१६ चा अर्थसंकल्प ६०० कोटीपेक्षा जास्त, मात्र उत्पन्न ३२१ कोटी, २०१६-१७ चा अर्थसंकल्प ६६४ कोटी, तर उत्पन्न ३८० कोटीचे आहे. उत्पन्न व खर्चात निम्या पेक्षा जास्त फरक असून महापालिकेचे खरे उत्पन्न १३० कोटी तर सरकारचे अनुदान २५० कोटी असे एकूण ३८० कोटीचा खरा अर्थसंकल्प आहे, अशी आकडेवारी सादर करत आयुक्तांनी गेल्या तीन वर्षातील अर्थसंकल्पाची हवाच काढून टाकली.भदाणेंची पदोन्नती अमान्यमहापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या पदोन्नतीचा विषय महासभेत आला. भाजपा व ओमी टीमचे नगरसेवक उपस्थित होते. रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव यांनी भदाणे यांना महापालिकेने काढून टाकले आहे, ते न्यायालयाच्या स्थगित आदेशावर आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल असून चौकशी सुरू आहे, असा मुद्दा मांडला. यावरून आयुक्त व भालेराव यांच्यात वाद झाला आणि आयुक्त रागाच्या भरात सभागृहाबाहेर पडले. मागोमाग अन्य अधिकारीही गेले. त्यानंतर महासभेने भदाणे यांचा विषय अमान्य करत अन्य तिघांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर