शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 15:52 IST

काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ठाणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ज्या पद्धतीने गणोशोत्सव साजरा केला, त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सवही साजरा करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

कळवा मुंब्रा या विधानसभा मतदार संघातही यंदा जो काही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे, तो देखील रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर जे काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्ण वाढत असतांना मृत्यदर कमी आहे. मात्र म्हणून नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री एकत्र येऊन भेटणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गर्दी करु नका, गरब्याचे आयोजन टाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कळवा मुंब्रा या मतदार संघात मागील १० वर्षे मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गरब्याचेही आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने येथील नागरिकांनी गरबा ठेवू नये किंवा नवरात्र उत्सवही रद्द करावा किंवा देवीचे आगमन कोणाच्या तरी घरात करावे, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने कळव्यातील पारसिक नगरमध्ये होणारा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणे, दर्शनाला जाणो टाळा असे आवाहनही त्यांनी केले. परंतु तसे न केल्यास पुढील दिवाळीही धोक्यात जाऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे इतर मंडळांनी देखील त्या दृष्टीने विचार करुन नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा किंवा रद्द करावा असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNavratriनवरात्रीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस