शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 15:52 IST

काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ठाणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ज्या पद्धतीने गणोशोत्सव साजरा केला, त्याच धर्तीवर आता नवरात्रोत्सवही साजरा करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

कळवा मुंब्रा या विधानसभा मतदार संघातही यंदा जो काही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे, तो देखील रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर जे काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

सप्टेंबर महिन्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्ण वाढत असतांना मृत्यदर कमी आहे. मात्र म्हणून नवरात्र उत्सवाच्या काळात रात्री एकत्र येऊन भेटणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गर्दी करु नका, गरब्याचे आयोजन टाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कळवा मुंब्रा या मतदार संघात मागील १० वर्षे मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गरब्याचेही आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने येथील नागरिकांनी गरबा ठेवू नये किंवा नवरात्र उत्सवही रद्द करावा किंवा देवीचे आगमन कोणाच्या तरी घरात करावे, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने कळव्यातील पारसिक नगरमध्ये होणारा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणे, दर्शनाला जाणो टाळा असे आवाहनही त्यांनी केले. परंतु तसे न केल्यास पुढील दिवाळीही धोक्यात जाऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे इतर मंडळांनी देखील त्या दृष्टीने विचार करुन नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा किंवा रद्द करावा असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNavratriनवरात्रीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस