शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम रखडले, खासदारांनी अधिकाऱ्यांची घेतली पालिकेत ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 2:07 AM

कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती.

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची शुक्रवारी अंबरनाथ पालिकेत शाळा भरवण्यात आली होती. रस्त्याचे काम रखडण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची खरडपट्टी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या बैठकीत अधिकारी आपली चूक लपवण्यासाठी दुसºया विभागाच्या अधिकाºयांकडे बोट दाखवत होते. अखेर, खासदारांनी सर्वच अधिकाºयांना आपले काम जबाबदारीने करण्याचे आणि रस्त्याच्या कामाच्या आड येणाºया समस्या सोडवण्याचे आदेश दिले.कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणात जमिनीखाली असलेल्या जल आणि वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचा विषय ही मुख्य समस्या झाली आहे. या वाहिन्या जोपर्यंत स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणे शक्य नाही. त्यातच ज्या सरकारी यंत्रणेच्या वाहिन्या रस्त्याच्या आड येत आहेत, त्या विभागातील अधिकारी आपली जबाबदारी सांभाळत नसल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.या रस्त्याच्या कामासंदर्भात येणाºया अडचणींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खासदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबरनाथ नगरपालिका, जीवन प्राधिकरण, महावितरणच्या अधिकाºयांची बैठक झाली.रस्त्याच्या अडचणीत या अधिकाºयांकडून एकत्रित काम केले जात नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याने ही बैठक घेण्याची वेळ आली. यावेळी सर्वच विभागांनी आपल्या समस्या मांडत बाजू मांडली. तर, या बैठकीत सर्वाधिक रोष हा एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर दिसत होता.जोपर्यंत जमिनीखालील विविध वाहिन्या स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत काम करणे शक्य नसल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यावर त्याचे काम करणे शक्य होणार आहे.या समस्यांवर तोडगा काढत असताना प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचे आणि वाढीव प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे आदेश खासदारांनी दिले. तसेच रस्त्याचे काम करताना सर्वच विभागांच्या अधिकाºयांनी आपली जबाबदारी सांभाळून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. आता यंत्रणा कधी हालाचल करतात याकडे लक्ष लागले आहे.विनापरवानगी टाकल्या वाहिन्याकल्याण-बदलापूर रस्त्यावर ज्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, त्यातील काही वाहिन्या टाकण्याची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना वाहिन्या टाकल्याने कंत्राटदाराने त्या वाहिन्या वरच्यावर टाकल्या आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी खोदकाम करणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.परवानगीला विलंब लावू नकारस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी गरजेची आहे. मात्र, ती परवानगी उशिराने मिळत असल्याने कामात अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात खासदारांनी वाहतूक विभागालाही परवानगीला विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक