शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला

By अजित मांडके | Updated: August 14, 2024 18:17 IST

ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे.

ठाणे -  विधानसभा निवडणुकीला सामोरे जातांना यातील जे प्रमुख नेते आहेत, त्यांचे तोंडे विरुध्द दिशेला असू नयेत, त्यांची तोंड एकमेकांसमोर असायला हवीत असा सल्ला माजी खासदार कपील पाटील यांनी शनिवारी महायुतीच्या झालेल्या बैठकीत दिला. तसेच जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे, तो सोशल मिडियाच्या माध्यमातून खोडून काढा असे आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केले. तसेच लोकसभा निवडणुकीत जे झाले ते आता न करता एकमेकांसमोबत समन्वय साधून काम करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ठाण्यात टिप टॉप येथे बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वयक मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक तसेच कोकणचे विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्ट पासून प्रचार यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे. एकजूट महाराष्टासाठी अभियान विकासासाठी कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मिडिया आर्मी तयार करुन त्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे. त्याला या आर्मीच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेला फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. त्यामुळे तो फेक नरेटीव्ह खोडण्यासाठी आपण एकत्र असणे गरजेचे असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.  

समन्वय साधला तरच पुढचा काळ चांगला आहे,लोकसभेत वाद झाले नव्हते. परंतु तिकीट वाटपला उशीर झाला होता. आता तसे होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरीष्ठ नेते ठरवतील असेही त्यांनी सांगितले.  कोकणात ७४ जागा असून त्या सर्वच जागा महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्याचा स्ट्राईक रेट हा ८५ टक्के पेक्षा पुढे असेल असा दावाही त्यांनी केला.

महायुतीच्या मेळाव्यातून आपण काय घेऊन जाणार आहोत हे महत्वाचे आहे. असे मेळावे घेण्यापेक्षा ज्यांची तोंड बघून लोक मत देतात त्यांची तोंडे एका दिशेने घ्या असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी दिला. लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या विधानसभेत होऊ नये, महायुतीचे सरकार हे महाराष्ट्राची गरज झाली आहे. गलती करो, बार बार करो, पर एक गलती बार बार मत करो असे सांगतांनाच एकमेकांच्या संख्या कमी करु नका अशा कानपिचक्या त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्ते म्हणतात तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे कधी तरी म्हणा महायुती आगे बढो हम तुम्हारे साथ हे असेही ते म्हणाले. तर सव्वा दोन वर्षे या सरकारला झाली तरी सुध्दा लोकांना सांगाव लागत आहे, हे परिस्थिती योग्य नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मायक्रो लेव्हलला लोकांचे प्रेम महायुतीवर कमी झाले आहे, घडलेल्या चुकांचा हा रिझल्ट आहे. कोण म्हणत चुका घडल्या नाहीत. परंतु आता त्यातून सुधारुन काठावर यश नको घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला.

लोकसभेत ठाणे, पालघर कल्याण या तीन जागा निवडून आल्या. परंतु भिवंडीचा जागा पडली. परंतु विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. विरोधकांकडून केवळ नरेटीव्ह पसरवले जात आहे. परंतु हा नरेटीव्ह खोडून काढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

एकच गमछा महायुतीचानिवडणुकीत प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतो. त्यातून काही वेळेस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणे देखील होतात. मात्र आता महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तीनही पक्षांचे चिन्ह ठेवा असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :MahayutiमहायुतीUday Samantउदय सामंतGanesh Naikगणेश नाईकnaresh mhaskeनरेश म्हस्केShiv SenaशिवसेनाBJPभाजपा