शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात; डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 02:52 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील ३४ पीएचसींमध्ये एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांद्वारे रुग्णांना सेवा दिली जाते. पाच पीएचसी बांधायच्या असून त्यासाठी जागा उपलब्ध नाही. गावपाड्यांच्या रुग्णांवरील उपचारासाठी ६७३ डॉक्टरांची पदे भरण्यास मंजुरी आहे. यापैकी ४४५ डॉक्टर भरती केले आहेत. उर्वरित १९२ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे उपचारांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. बहुतांश ठिकाणी रुग्णांवर वेळीच प्राथमिक उपचार होत नसल्यामुळे त्यांना गंभीर आजारास तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.पीएचसीमध्ये सोयी सुविधांचादेखील अभाव आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागली. या गंभीर समस्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष घरत यांनी लावून धरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कल्याणजवळील गोवेली रुग्णालय सोयीसुविधायुक्त करून सुरू करण्याची मागणी आहे. शहापूर परिसरातील शेंद्रुण व वडाचापाडा, सपारपाडा येथील ग्रामस्थांना तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या चार केंद्रांचा निधीदेखील पडून असल्याचे कल्याणचे सभापती सांगतात.नवघर, पडघा येथे लाखो रुपये खर्चून आरोग्य केंद्रे बांधली आहेत. पण, डॉक्टर नसल्यामुळे या इमारती वापराविना पडून असल्याचे जि.प. सदस्य कुंदन पाटील यांनी उघड केले. २७ गावे परिसरांसाठी नेवाळी पीएचसी उपयुक्त आहे. पण, ते सध्या नवी मुंबई महापालिकेकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले नाही.जागा विकतघेण्याची हवी तरतूदजिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. पण, बहुतांश आरोग्य केंद्रे जागेअभावी उभी राहत नसल्याचे दिसून आले. या आरोग्य केंद्रांसाठी सधन व्यक्तीने त्याची जागा दान करण्याची शासनाची अपेक्षा आहे. पण, जागेच्या किमती पाहता आता कोणीही जागा देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आरोग्य केंद्रांचा निधी पडून आहे. यावर मात करण्यासाठी जागा विकत घेण्याची परवानगी शासनाकडून मिळवण्याचा सल्ला मुरबाडचे सदस्य बांगर यांनी दिला.७५ टक्के एमबीबीएस डॉक्टरांची गरजडॉक्टरांसह विविध सोयीसुविधांअभावी कुंदे येथील पीएचसी बंद आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर परिपूर्ण उपचार व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये ७५ टक्के एमबीबीएस डॉक्टर व २५ टक्के बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करण्याचा नियम आहे. पण, डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चर्चेत आहे.

टॅग्स :thaneठाणे