शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात; डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 02:52 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील ३४ पीएचसींमध्ये एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांद्वारे रुग्णांना सेवा दिली जाते. पाच पीएचसी बांधायच्या असून त्यासाठी जागा उपलब्ध नाही. गावपाड्यांच्या रुग्णांवरील उपचारासाठी ६७३ डॉक्टरांची पदे भरण्यास मंजुरी आहे. यापैकी ४४५ डॉक्टर भरती केले आहेत. उर्वरित १९२ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे उपचारांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. बहुतांश ठिकाणी रुग्णांवर वेळीच प्राथमिक उपचार होत नसल्यामुळे त्यांना गंभीर आजारास तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.पीएचसीमध्ये सोयी सुविधांचादेखील अभाव आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागली. या गंभीर समस्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष घरत यांनी लावून धरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कल्याणजवळील गोवेली रुग्णालय सोयीसुविधायुक्त करून सुरू करण्याची मागणी आहे. शहापूर परिसरातील शेंद्रुण व वडाचापाडा, सपारपाडा येथील ग्रामस्थांना तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या चार केंद्रांचा निधीदेखील पडून असल्याचे कल्याणचे सभापती सांगतात.नवघर, पडघा येथे लाखो रुपये खर्चून आरोग्य केंद्रे बांधली आहेत. पण, डॉक्टर नसल्यामुळे या इमारती वापराविना पडून असल्याचे जि.प. सदस्य कुंदन पाटील यांनी उघड केले. २७ गावे परिसरांसाठी नेवाळी पीएचसी उपयुक्त आहे. पण, ते सध्या नवी मुंबई महापालिकेकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले नाही.जागा विकतघेण्याची हवी तरतूदजिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. पण, बहुतांश आरोग्य केंद्रे जागेअभावी उभी राहत नसल्याचे दिसून आले. या आरोग्य केंद्रांसाठी सधन व्यक्तीने त्याची जागा दान करण्याची शासनाची अपेक्षा आहे. पण, जागेच्या किमती पाहता आता कोणीही जागा देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आरोग्य केंद्रांचा निधी पडून आहे. यावर मात करण्यासाठी जागा विकत घेण्याची परवानगी शासनाकडून मिळवण्याचा सल्ला मुरबाडचे सदस्य बांगर यांनी दिला.७५ टक्के एमबीबीएस डॉक्टरांची गरजडॉक्टरांसह विविध सोयीसुविधांअभावी कुंदे येथील पीएचसी बंद आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर परिपूर्ण उपचार व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये ७५ टक्के एमबीबीएस डॉक्टर व २५ टक्के बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करण्याचा नियम आहे. पण, डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चर्चेत आहे.

टॅग्स :thaneठाणे