शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:09 IST

वेळोवेळी लादलेल्या अघोषित वाढीचे काय? : एकीकडे लूट आणि दुसरीकडे उद्धटपणा; बेशिस्त वर्तणुकीला प्रवासी वैतागले

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या असताना, या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. मुळात बहुतांश रिक्षा सीएनजीवर चालत असताना, पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षांची भाडेवाढ करण्याचे कारणच काय, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

कोरोना काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे घेतले जाते. नवखा प्रवासी असेल, तर याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. 

२०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. खटुआ समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे. - जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

भाडेवाढीचा निर्णय उत्तम आहे. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही तरी दिलासा मिळेल.- रवींद्र पाफाळे,रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे

टॅग्स :Petrolपेट्रोल