शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:09 IST

वेळोवेळी लादलेल्या अघोषित वाढीचे काय? : एकीकडे लूट आणि दुसरीकडे उद्धटपणा; बेशिस्त वर्तणुकीला प्रवासी वैतागले

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या असताना, या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. मुळात बहुतांश रिक्षा सीएनजीवर चालत असताना, पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षांची भाडेवाढ करण्याचे कारणच काय, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

कोरोना काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे घेतले जाते. नवखा प्रवासी असेल, तर याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. 

२०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. खटुआ समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे. - जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

भाडेवाढीचा निर्णय उत्तम आहे. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही तरी दिलासा मिळेल.- रवींद्र पाफाळे,रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे

टॅग्स :Petrolपेट्रोल