शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:41 AM

शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत.

जनार्दन भेरे 

भातसानगर : शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नडगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मानाचा पाडा येथे आहे. या पाड्याची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास असून पाड्यासाठी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत गावातील विहिरीवरून साडेसात लाखांची पाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, ज्या विहिरीवरून ही योजना करण्यात आली त्याच विहिरीचे पाणी आटल्याने पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली.

नागरिकांना पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने ठराव पाठवून या पाड्याला टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी इतर दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या विषयी गावचे सरपंच नरेश हरी रेरा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी या विहिरीत पाणी असते. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याने विहिरीचे पाणी आटले आहे. गावातील लोकांची गरज लक्षात घेत पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तालुक्यांतील अनेक तलाव आटल्याने तर काही तलावांची पाणी पातळी खालावल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईshahapurशहापूर