शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? विक्रांत चव्हाण यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 21:54 IST

मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

ठाणे : पोलिसांचा खून करणाऱ्या गँगस्टरला सोबत घेऊन ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणारे ठामपाच्या सहायक आयुक्तांवरील कारवाईला दिरंगाई कशामुळे होत आहे, असा सवाल ठाणे काँग्रेसचे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना बुधवारी पत्राद्वारे केला.

चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, जे.जे. हॉस्पिटल हत्याकांडात दोन पोलिसांची झालेली हत्या आणि उल्हासनगर येथील घनश्याम भतिजा, इंदर भतिजा हत्या प्रकरणात दोन पोलिसांची हत्या झाली होती. यामध्ये दोषसिद्धी झालेल्या कुविख्यात गुंडाबरोबर संबंध ठेवून त्याच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिकेच्या सहायक आयुक्तांवर कारवाईला दिरंगाई म्हणजे पोलिस खात्यास शरमेची बाब आहे. 

पोलिसांची हत्या करणाऱ्यांवर जर पोलिस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असतील तर सामान्यांबरोबरच पोलिसांवरही अन्याय आहे. मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिस