शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

प्रश्न विचारले तर नगरसेवक चोर होतात का?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:58 IST

शहराच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा काही चुकीची कामे प्रशासनाकडून सुरू असतील, तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले म्हणजे नगरसेवक चोर होतो का, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी महासभेत विचारला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

ठाणे : शहराच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा काही चुकीची कामे प्रशासनाकडून सुरू असतील, तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले म्हणजे नगरसेवक चोर होतो का, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी महासभेत विचारला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.महासभा सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासाला शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे त्यांना दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या अनुषंगाने बोलत होत्या. प्रशासनाने दिलेले उत्तर मोघम असून अशा पद्धतीने वारंवार प्रश्न विचारूनही प्रशासनाकडून अशा पद्धतीने उत्तरे मिळत असतील, तर आम्ही प्रश्न विचारायचेच नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी नगरसेवक प्रश्न विचारतो, म्हणजे तो काही अपराध करतो का? शहर विकासाच्या दृष्टीने किंवा काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर तो प्रश्न विचारत असतो. त्यात त्याचा स्वार्थ असत नाही. त्यामुळे एखाद्याने प्रश्न विचारला म्हणजे तो चोर होतो का, याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. दुसरीकडे प्रश्नोत्तरे कायद्याने किंवा नियमाने विचारली जावीत. नियमाच्या अनुषंगाने असतील, तरच त्याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी केली. त्यानुसार, जे नियमानुकूल नसतील, त्या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसल्याचे मत सचिव अशोक बुरपुल्ले यांनी व्यक्त केले. त्यांच्या उत्तरावरून सत्ताधारी नगरसेवक संतप्त झाले आणि यापूर्वी अशा प्रकारे किती प्रश्न आपण नाकारली, याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. तसेच हे प्रश्न नाकारण्याचा अधिकार महापौरांना असल्याने प्रशासनाने त्यांनी त्यांचे काम करावे, अशी समजही सेना नगरसेवकांनी प्रशासनाला दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका