शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काय केले?; राज्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 12:31 AM

आयुक्तांना पाठवलेल्या पत्रावर ‘फेरीवाला संघर्ष’चा सवाल

डोंबिवली : फेरीवाल्यांच्या हाणामारीप्रकरणी राज्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून कारवाईची मागणी केली असताना दुसरीकडे चव्हाण यांच्या या भूमिकेचा फेरीवाला संघर्ष समितीने निषेध केला आहे. कारवाई करण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी पाच वर्षे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी काय केले?, असा सवाल संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केला आहे.

फेरीवाल्यांच्या दोन गटांत सोमवारी हाणामारी झाल्यानंतर केडीएमसीने बुधवारपासून रेल्वेस्थानकातील १५० मीटर हद्दीत अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. मात्र, चव्हाण यांनी तत्पूर्वी आयुक्तांना खरमरीत पत्र पाठवून बेकायदा फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करणे आपल्या प्रशासनाला जमत नसेल तर अशा कुचकामी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण बदली करून घ्यावी हे उत्तम, अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळेच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने बुधवारी सायंकाळपासून कारवाईला प्रारंभ केला.

दुसरीकडे फेरीवाला संघर्ष समितीने मात्र चव्हाण यांची भूमिका एकाकी असल्याचा आरोप केला आहे. फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली गेली आहे, मात्र पाच वर्षे राज्यमंत्री असतानाही फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चव्हाण यांनी काय केले? राज्यमंत्री म्हणून चव्हाण राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याच सरकारचे धोरण न राबविता के वळ कारवाईची भूमिका घेणे चुकीचे आहे.एकीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, असे सरकार आदेश देते तर दुसरीकडे धोरणाची अंमलबजावणी न करता कारवाईची भाषा सुरू आहे, हा दुटप्पीपणा चव्हाण यांनी थांबवावा आणि सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष मोरे यांनी केली आहे.माझे शहर शांत राहिले पाहिजे - चव्हाणफेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तांचे आहे. आता जे हाणामारीचे प्रकार शहरांमध्ये घडले आहेत ते पूर्णपणे थांबले पाहिजेत. याप्रकरणी कडक कारवाई झाली पाहिजे. कोणाला नुकसान पोहोचावे आणि कोणाला फायदा व्हावा, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहरात जे प्रकार घडतायत ते निंदनीय आहे. अरविंद मोरे यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझे शहर फेरीवालामुक्त असावे. शांतता राहावी आणि नागरिकांना रस्ते पदपथ चालण्यासाठी राहावेत असे माझे मत आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.तातडीने धोरण राबवा - कांबळेडोंबिवली हॉकर्स भाजीपाला फेडरेशन या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी फेरीवाला धोरणाची विनाविलंब अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. आम्ही फेरीवाला शहर समितीचे सदस्य म्हणून प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. परंतू, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढल्याचे कबूल करताना कांबळे यांनी बाहेरून व्यवसायासाठी येणाºया फेरीवाल्यांचे समर्थन केले आहे. डोंबिवलीकर व्यवसाय करण्यासाठी अन्य शहरांमध्ये जात नाहीत का?, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.फेरीवाला हा देखील एक माणूस आहे. त्यालाही पोट आहे. परंतु, केडीएमसी प्रशासन फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला जाणूनबुजून विलंब लावत असल्याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे मोरे हे शिवसेना कल्याण पश्चिम आणि पूर्व विधासभा क्षेत्रप्रमुख आहेत.राज्यमंत्री चव्हाण हे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आहेत. दरम्यान, मोरे यांच्या वक्तव्यावर चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता फेरीवाला कारवाईवरून शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका