शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लॉकडाऊनने नेमके साधले काय?, विविध शहरांमधील व्यापाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 00:06 IST

सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनामुळे तीन ते साडेतीन महिन्यांपासून व्यापार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अनलॉक १ जाहीर करुन व्यवहार सुरळीत होत नाही तोच रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत उल्हासनगर पालिका क्षेत्रात २ ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होईल असे प्रशासनाला वाटत होते, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट या दहा दिवसांत १८०० रुग्णांची वाढ झाली. आता पुन्हा २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन करुन प्रशासनाने काय साधले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित रेला आहे.उल्हासनगरमध्ये फर्निचर, जीन्स, जपानी, गजानन, गाऊन, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. राज्यातून येथे खरेदीसाठी व्यापारी व नागरिक येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला मान देऊन, व्यापाºयांनी दुकाने बंद केली. प्रत्येकवेळी व्यापाºयांनी नाईलाजाने लॉकडाऊनचे समर्थन केले. अनलॉक १ जाहीर झाल्यावर व्यापाºयांनी नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु केले. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २ जुलै ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. त्यापूर्वी व्यापारी संघटनेने स्वत:हून लॉकडाऊन करा, असे पत्र महापालिकाला दिले होते. शहरात लॉकडाऊन दरम्यान महापालिकेने विविध उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र त्या केलेल्या दिसल्या नाहीत. लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हे लोकशाहीत बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.व्यापारी, कामगारांवर आली आहे उपासमारीची वेळशहरातील बहुतांश व्यापारी धार्मिक वृत्तीचे असल्याने कामावर असलेल्या बहुतांश कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार देत आहेत. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला महापालिकेचे धोरण कारणीभूत असल्याचे मतही सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस