शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

लॉकडाऊनने नेमके साधले काय?, विविध शहरांमधील व्यापाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 00:06 IST

सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनामुळे तीन ते साडेतीन महिन्यांपासून व्यापार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अनलॉक १ जाहीर करुन व्यवहार सुरळीत होत नाही तोच रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत उल्हासनगर पालिका क्षेत्रात २ ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होईल असे प्रशासनाला वाटत होते, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट या दहा दिवसांत १८०० रुग्णांची वाढ झाली. आता पुन्हा २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन करुन प्रशासनाने काय साधले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित रेला आहे.उल्हासनगरमध्ये फर्निचर, जीन्स, जपानी, गजानन, गाऊन, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. राज्यातून येथे खरेदीसाठी व्यापारी व नागरिक येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला मान देऊन, व्यापाºयांनी दुकाने बंद केली. प्रत्येकवेळी व्यापाºयांनी नाईलाजाने लॉकडाऊनचे समर्थन केले. अनलॉक १ जाहीर झाल्यावर व्यापाºयांनी नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु केले. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २ जुलै ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. त्यापूर्वी व्यापारी संघटनेने स्वत:हून लॉकडाऊन करा, असे पत्र महापालिकाला दिले होते. शहरात लॉकडाऊन दरम्यान महापालिकेने विविध उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र त्या केलेल्या दिसल्या नाहीत. लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हे लोकशाहीत बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.व्यापारी, कामगारांवर आली आहे उपासमारीची वेळशहरातील बहुतांश व्यापारी धार्मिक वृत्तीचे असल्याने कामावर असलेल्या बहुतांश कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार देत आहेत. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला महापालिकेचे धोरण कारणीभूत असल्याचे मतही सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस