शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:58 IST

राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता.

ठाणे   - रविवारचा जनता कर्फ्यूला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर सोमवारी मात्र शहरातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. काहीना काही खोटी कारणे सांगून नागरीक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता. दुसरीकडे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान, स्टॉल हॉटेल, बार रेस्टॉरन्ट बंद असल्याचे दिसून आले. परंतु घरातून बाहेर पडलेल्या वाहन चालकांना ठाण्याच्या हद्दीवर रोखले जात होते आणि परत घरी पाठविले जात होते.रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी याच्या उलट चित्र शहराच्या अनेक भागात दिसून आले सकाळी आनंदनगर टोलनाका या टोलनाक्यावर गाड्यांची रांगा लागल्या होत्या मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेशी निगिडत जाणाऱ्या गाडय़ांना फक्त मुंबई दिशेने रवाना करण्यात आल्या तर बाकीच्या गाड्या पुन्हा ठाण्याला रवाना केल्या जात होत्या. असेच चित्र ठाणो इस्टर्न इम्प्रेस हायवे दिसत होते. ठाण्यातून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या,यावेळी काही लोकांनी पोलिसांना सोबत हुज्जत ही घातला, काहींनी मी सायन्टिस्ट असल्याचे सांगितले, तर काही जण महत्वाचे काम असल्याचे सांगत होते. तर काही नागरिक केवळ मोकळा रस्ता असल्याने बाहेर पडल्याचे सांगत होते. या सर्वाना सुरवातीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनाही काहींना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आल्याचे दिसून आले.करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा या साठी रेल्वेची सेवा बंद झाली आहे. तसेच शहरातील टीएमटीची सेवा देखील ठराविक काळासाठीच सुरू होती, ती देखील अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु होती. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी वाहनाचा वापर करीत ठाण्याच्या विविध नाक्यांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आनंद नगर टोलनाक्यावर तर अधिकची वाहनांची रांग लागली होती. त्यात नागरिकांना समजावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे नागरिकानी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली असतानाच आनंद शनगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी लावून अनावश्यक गाड्या परत पाठवल्या. दुसरीकडे शहरातील कॅडबरी, नितीन कंपनी, तीनहात नाका, वर्तकनगर, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, वाघबीळ, कळवा नाका, कोर्ट नाका आदींसह महत्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तरीसुध्दा नागरीक यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. तर शहरातील इतर मार्गावर मात्र वाहनांची संख्या कमी असल्याचे चित्र होते.दुसरीकडे शहरातील दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आदींसह इतर महत्वाची दुकाने,मॉलसुध्दा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरु असल्याचे दिसत होते. परंतु त्याठिकाणी देखील सामान घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले असतांनाही अशा पध्दतीने नागरींनी गर्दी केल्याने त्याच्यातून धोका कसा टाळायचा असा सवाल आता उपस्थित झाला आहे. भाजीपाला महागलावाशीतील एपीएमसी मार्केट बंद झाल्याने मार्केटमध्ये भाजीपाला आलेला नाही. जांभळीचे मार्केट देखील रविवारी बंद होते. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. अनेक ठिकाणी असलेल्या तुरळक भाजी विक्रेत्यांनी भाज्या चढय़ा भावाने विकल्याचे दिसून आले.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस