शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:58 IST

राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता.

ठाणे   - रविवारचा जनता कर्फ्यूला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर सोमवारी मात्र शहरातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. काहीना काही खोटी कारणे सांगून नागरीक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता. दुसरीकडे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान, स्टॉल हॉटेल, बार रेस्टॉरन्ट बंद असल्याचे दिसून आले. परंतु घरातून बाहेर पडलेल्या वाहन चालकांना ठाण्याच्या हद्दीवर रोखले जात होते आणि परत घरी पाठविले जात होते.रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी याच्या उलट चित्र शहराच्या अनेक भागात दिसून आले सकाळी आनंदनगर टोलनाका या टोलनाक्यावर गाड्यांची रांगा लागल्या होत्या मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेशी निगिडत जाणाऱ्या गाडय़ांना फक्त मुंबई दिशेने रवाना करण्यात आल्या तर बाकीच्या गाड्या पुन्हा ठाण्याला रवाना केल्या जात होत्या. असेच चित्र ठाणो इस्टर्न इम्प्रेस हायवे दिसत होते. ठाण्यातून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या,यावेळी काही लोकांनी पोलिसांना सोबत हुज्जत ही घातला, काहींनी मी सायन्टिस्ट असल्याचे सांगितले, तर काही जण महत्वाचे काम असल्याचे सांगत होते. तर काही नागरिक केवळ मोकळा रस्ता असल्याने बाहेर पडल्याचे सांगत होते. या सर्वाना सुरवातीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनाही काहींना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आल्याचे दिसून आले.करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा या साठी रेल्वेची सेवा बंद झाली आहे. तसेच शहरातील टीएमटीची सेवा देखील ठराविक काळासाठीच सुरू होती, ती देखील अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु होती. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी वाहनाचा वापर करीत ठाण्याच्या विविध नाक्यांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आनंद नगर टोलनाक्यावर तर अधिकची वाहनांची रांग लागली होती. त्यात नागरिकांना समजावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे नागरिकानी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली असतानाच आनंद शनगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी लावून अनावश्यक गाड्या परत पाठवल्या. दुसरीकडे शहरातील कॅडबरी, नितीन कंपनी, तीनहात नाका, वर्तकनगर, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, वाघबीळ, कळवा नाका, कोर्ट नाका आदींसह महत्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तरीसुध्दा नागरीक यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. तर शहरातील इतर मार्गावर मात्र वाहनांची संख्या कमी असल्याचे चित्र होते.दुसरीकडे शहरातील दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आदींसह इतर महत्वाची दुकाने,मॉलसुध्दा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरु असल्याचे दिसत होते. परंतु त्याठिकाणी देखील सामान घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले असतांनाही अशा पध्दतीने नागरींनी गर्दी केल्याने त्याच्यातून धोका कसा टाळायचा असा सवाल आता उपस्थित झाला आहे. भाजीपाला महागलावाशीतील एपीएमसी मार्केट बंद झाल्याने मार्केटमध्ये भाजीपाला आलेला नाही. जांभळीचे मार्केट देखील रविवारी बंद होते. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. अनेक ठिकाणी असलेल्या तुरळक भाजी विक्रेत्यांनी भाज्या चढय़ा भावाने विकल्याचे दिसून आले.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस