शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ठाण्यात मतदारराजावर ‘बदाबदा’, पाणीकपात सहा तासांनी केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 04:44 IST

महापालिकेचा निर्णय : पाणीकपात सहा तासांनी केली कमी

ठाणे : लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना दोन दिवसांनी जारी होत असतानाच ठाणे महापालिकेने स्टेम आणि स्वत:च्या योजनेतून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात ही ३० तासांवरून २४ तासांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना दिलासा मिळणार आहे. तसेच कळव्याच्या काही भागांतही यामुळे पाणीकपात थोड्या प्रमाणात कमी होणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतल्यामुळे ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाणीकपात सुरू झाली आहे. सुरुवातीला ही कपात १२ तासांची होती, त्यानंतर त्यात वाढ होऊन ती ३० तासांपर्यंत केली. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ठाणेकरांना पाणीकपातीच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत होत्या. ३० तासांच्या पाणीकपातीमुळे शहरासह कळवा, मुंब्य्रातील अनेक उंचावरील भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ठाणेकर चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.

ठाणेकरांची ही संतापाची भावना लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ठाणे मतदारसंघातील निवडणुकीची धामधूम सुरू होत असल्याने ठाणे महापालिकेने आता पाणीकपात कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नौपाडा, कोपरी, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, किसननगर, रायलादेवी आदींसह कळव्यातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.दुसरीकडे एमआयडीसीचा पाणीपुरवठा हा कळव्याचा काही भाग, मुंब्रा आणि दिवा येथे होत आहे. परंतु, या भागात ३० तासांची पाणीकपात कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. येथील पाणीकपात २४ तासांवर आणण्यासाठी एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, अद्याप त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नाही.मतदान होताच कपात वाढणार? : ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर या भागातील पाणीकपात वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत यापूर्वी दिले गेले आहेत. त्यामुळे सध्याचा दिलासा हा तात्पुरता असून त्यानंतर पुन्हा अधिक तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक