शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

ठाण्यात मतदारराजावर ‘बदाबदा’, पाणीकपात सहा तासांनी केली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 04:44 IST

महापालिकेचा निर्णय : पाणीकपात सहा तासांनी केली कमी

ठाणे : लोकसभा निवडणुकीची चौथ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना दोन दिवसांनी जारी होत असतानाच ठाणे महापालिकेने स्टेम आणि स्वत:च्या योजनेतून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात ही ३० तासांवरून २४ तासांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना दिलासा मिळणार आहे. तसेच कळव्याच्या काही भागांतही यामुळे पाणीकपात थोड्या प्रमाणात कमी होणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतल्यामुळे ठाणेकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाणीकपात सुरू झाली आहे. सुरुवातीला ही कपात १२ तासांची होती, त्यानंतर त्यात वाढ होऊन ती ३० तासांपर्यंत केली. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ठाणेकरांना पाणीकपातीच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत होत्या. ३० तासांच्या पाणीकपातीमुळे शहरासह कळवा, मुंब्य्रातील अनेक उंचावरील भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ठाणेकर चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.

ठाणेकरांची ही संतापाची भावना लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ठाणे मतदारसंघातील निवडणुकीची धामधूम सुरू होत असल्याने ठाणे महापालिकेने आता पाणीकपात कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नौपाडा, कोपरी, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, किसननगर, रायलादेवी आदींसह कळव्यातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.दुसरीकडे एमआयडीसीचा पाणीपुरवठा हा कळव्याचा काही भाग, मुंब्रा आणि दिवा येथे होत आहे. परंतु, या भागात ३० तासांची पाणीकपात कायम राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. येथील पाणीकपात २४ तासांवर आणण्यासाठी एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, अद्याप त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळू शकलेले नाही.मतदान होताच कपात वाढणार? : ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर या भागातील पाणीकपात वाढवली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत यापूर्वी दिले गेले आहेत. त्यामुळे सध्याचा दिलासा हा तात्पुरता असून त्यानंतर पुन्हा अधिक तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक