शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शहापूर तालुक्यातील दोन पाड्यांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:11 IST

ग्रामस्थांची वणवण : टँकरची केली मागणी

भातसानगर : शहापूर तालुक्यात हिवाळा संपतो न संपतो तोच दोन पाड्यात पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने गावपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी अधिक पाऊस पडल्यामुळे उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे.

कोळी पाडा व वारली पाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. मात्र आता याच विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्या ही शंभर इतकी असून या दोन्ही पाड्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी सोमवारीच ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. अजूनही हिवाळा संपला नसूनही या पाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना आता पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. दरवर्षी या पाड्यात टंचाई निर्माण होत असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कोळीपाडा, वरचा गायदरा या दोन पाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. - प्रदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य 

टॅग्स :water shortageपाणीकपातshahapurशहापूर