शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कल्याणच्या १४ गावाना तीव्र पाणी टंचाई; केमिकल्स मिश्रित पाण्याकडे ठाणे जि.प.च्या दुर्लक्षाने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:04 IST

केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाºया १४ गावातील नारिकाना तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावाना महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाव्दारे(एमजेपी) पाणी पुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार - आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीचे पाणी सोडले . एमआयडीसीचा व्हॉल खोलून सुरळीत पाणी पुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देबोरिंगमध्ये केमिकल्स झिरपल्यामुळे गावकऱ्यांना केमिकल्स मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंगएमजेपीच्या नियंत्रणात साडे सहा कोटी रूपये जिल्ह परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे.सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पुन्हा साडे बारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे

सुरेश लोखंडेठाणे : नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेले १४ गांवे ठाणे जिल्हा परिषदेत (जि.प.) समाविष्ट करण्यात आले. मात्र त्यांना अत्यावश्यक सोयी , सुविधांसह तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बोरिंगमध्ये केमिकल्स झिरपल्यामुळे गावकऱ्यांना केमिकल्स मिश्रित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला.पाण्याच्या नावाखाली साडेसहा कोटींची उदळपट्टी करणाऱ्यां प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याच्या वृत्तास जि.प. सदस्य रमेश पाटील यांनी दुजोरा दिला.केमिकल्स कंपन्यांमधील भंगार,ड्रम कुर्ला, कल्याण आणि उल्हासनगर येथील भंगारवाले विकत घेतात. त्यातील केमिकल्स ते परिसरातच ओतत आहेत. मोठ्याप्रमाणात टाकण्यात येत असलेले केमिकल्स बोरिंगमध्ये झिरपले आहे. यामुळे बोरिंगचे पाणी केमिकल्स मिश्रित झाले. या विषारी पाण्याचा सामना करणाऱ्यां १४ गावातील नारिकाना तीव्र पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील या गावाना महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणाव्दारे (एमजेपी) पाणी पुरवठा होतो. एमजेपीच्या या प्रशासनाकडून खासदार - आमदारांची शाबासकी मिळवण्यासाठी तात्पुरते एमआयडीसीचे पाणी सोडले . एमआयडीसीचा व्हॉल खोलून सुरळीत पाणी पुरवठा असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच एका कार्यक्रमाव्दारे भासवल्याच्या वृत्तासही पाटील यांनी दुजोरा दिला आहे.एमजेपीच्या नियंत्रणात साडे सहा कोटी रूपये जिल्ह परिषदेने खर्च केल्याचे दिसून येत आहे. त्याव्दारे अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि तुटलेली पाइप लाइन दिसून येत आहे. सुमारे २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या साडे सहा कोटींच्या कामातून तांब्याभर पाणी देखील १४ गावाना आजपर्यंत मिळालेले नाही. २७ महिन्यात काम पूर्ण करायचे होते. मात्र ते आजपर्यंतही पूर्ण झाले नाही. संबंधीत ठेकेदार कंपनीला जिल्हा परिषद व एमजेपी पाठिशी घालून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसायला भाग पाडत आहे. साडे सहा कोटी खर्चाचे काम दाखवण्यासाठी नवी मुंबईच्या जुन्या पाइप लाइनला व्हॉल लावून ती गृहीत धरण्याचा पराक्रमही प्रशासनाने केला. जुन्या लाइनमुळे ती सतत फूटत आहे. प्रेशरने पाणी सोडता येत नाही. यामुळे १४ गावातील नागरिकाना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. पण त्यावर काहीच केले जात नसल्याची खंत पाटील यांनी लोकमतकडे व्यक्त केली.सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पुन्हा साडे बारा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे. पण आधीच्या साडे सहा कोटींच्या खर्चाचे मात्र कोणी ऐकूणच घ्यायला मागत नसल्याची खंत लोकप्रतिनिधी म्हणून पाटील यांनी व्यक्त केली. या परिसरात १९ गावांचा समावेश आहे. त्यातील वडवली, शिरडोन खानिवडे आदी गावाना बऱ्यांपैकी पाणी मिळते. पण खोणी, अंतरर्ली, पागड्याचा पाडा, दहिसर, पिंपरी, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडारली, उत्तरशीव, गोठेघर, नारिवली, बाळे आणि वाकळन आदीं गावकऱ्यांना गंभीर पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या तीव्र संतापातून नांगावला कृषीचा कार्यक्रम महिला घेऊ दिला नाही. तीन महिन्यात पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन देऊनही लोकप्रतिनिधींनी काम केले नसल्याचा राग या गावकऱ्यांमध्ये असल्याची जाणीव पाटील यांच्यासह काही गावकऱ्यांनी निदर्शनात आणून दिली.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद