शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

भिवंडीतील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर; नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 19:08 IST

Water Scarcity In Bhiwandi : खारबाव व परिसरातील गावांना स्टेमकडून मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - मे महिन्याच्या शेवटी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून सध्या तालुक्यातील खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या भागात नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांची पाणी समस्या मार्गी लावावी अशी मागणी खारबाव गावातील नागरिकांसह परिसरातील गावांनी स्टेम प्राधिकरणाकडे मागील कित्येक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे स्टेम प्राधिकरणाचे पुरता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खारबावसह परिसरातील नागरिक करीत आहेत. 

खारबाव व परिसरातील गावांना स्टेमकडून मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. विशेषम्हणजे रात्री उशिरा एक ते तीन तर कधी कधी पहाटे चार वाजता नळाला पाणी येत असल्याने पाण्याची वाट भगत महिला वर्गाची मोठी झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे खारबाव विभागात मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वाढत असून पाणी समस्या बिकट झाली आहे. त्यामुळे या भागात पाण्याची नवी पाईप लाईन टाकून नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत मात्र त्याकडे स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पुरता दुर्लक्ष होत असल्याने सध्या नागरिकांना पिण्याचे पाणी दोन ते तीन दिवसाआड येत असून पाण्यासाठी महिला वर्गाची मोठी पायपीट होत आहे. त्यातच रात्री अपरात्री अवेळी नळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये स्टेम प्राधिकरणाविरोधात मोठा संताप पसरला आहे.

खारबाव व परीसारतील नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी या भागाला मुबलक पाणी पुरवठा करावा तसेच सकाळच्या सुमारास योग्य वेळेचे नियोजन करून वडघर तसेच खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करावा त्याचबरोबर वडघर ते खारबाव नवीन पाइप लाइन टाकणे संदर्भात दिनांक १६ मार्च २०२० रोजी स्टेमकडून ठराव झालेला असून या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये सदर कामे मंजूर करून निविदा काढून सदर कामास त्वरित सुरुवात करावी अशी मागणी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अशोक पालकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून आमच्या परिसरात पाणी पुरवठा मुबलक व सुरळीत न झाल्यास हक्काच्या पाण्यासाठी ऐन कोरोना संकटात देखील आम्ही जन आंदोलन करू असा इशारा देखील पालकर यांनी दिला आहे.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीbhiwandiभिवंडी