शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर; नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 19:08 IST

Water Scarcity In Bhiwandi : खारबाव व परिसरातील गावांना स्टेमकडून मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - मे महिन्याच्या शेवटी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून सध्या तालुक्यातील खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या भागात नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांची पाणी समस्या मार्गी लावावी अशी मागणी खारबाव गावातील नागरिकांसह परिसरातील गावांनी स्टेम प्राधिकरणाकडे मागील कित्येक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे स्टेम प्राधिकरणाचे पुरता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खारबावसह परिसरातील नागरिक करीत आहेत. 

खारबाव व परिसरातील गावांना स्टेमकडून मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. विशेषम्हणजे रात्री उशिरा एक ते तीन तर कधी कधी पहाटे चार वाजता नळाला पाणी येत असल्याने पाण्याची वाट भगत महिला वर्गाची मोठी झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे खारबाव विभागात मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वाढत असून पाणी समस्या बिकट झाली आहे. त्यामुळे या भागात पाण्याची नवी पाईप लाईन टाकून नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत मात्र त्याकडे स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पुरता दुर्लक्ष होत असल्याने सध्या नागरिकांना पिण्याचे पाणी दोन ते तीन दिवसाआड येत असून पाण्यासाठी महिला वर्गाची मोठी पायपीट होत आहे. त्यातच रात्री अपरात्री अवेळी नळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये स्टेम प्राधिकरणाविरोधात मोठा संताप पसरला आहे.

खारबाव व परीसारतील नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी या भागाला मुबलक पाणी पुरवठा करावा तसेच सकाळच्या सुमारास योग्य वेळेचे नियोजन करून वडघर तसेच खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करावा त्याचबरोबर वडघर ते खारबाव नवीन पाइप लाइन टाकणे संदर्भात दिनांक १६ मार्च २०२० रोजी स्टेमकडून ठराव झालेला असून या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये सदर कामे मंजूर करून निविदा काढून सदर कामास त्वरित सुरुवात करावी अशी मागणी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अशोक पालकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून आमच्या परिसरात पाणी पुरवठा मुबलक व सुरळीत न झाल्यास हक्काच्या पाण्यासाठी ऐन कोरोना संकटात देखील आम्ही जन आंदोलन करू असा इशारा देखील पालकर यांनी दिला आहे.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीbhiwandiभिवंडी