शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:31 IST

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनेक भागातील बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेच्या वतीने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गणेशोत्सवानंतर ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात सांगितले आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सुरू होण्यापूर्वी आता शिल्लक राहिलेल्या ६८२ बांधकामांचे वीज, पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई होणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे. या बांधकामाधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून, येथील घरे रिकामी करण्यासाठी नोटिसाही बजावणार असल्याचेही अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्रा-शीळ भागातील २१ बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेच्या वतीने कारवाई केली. नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत ठाणे पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ९०९ बेकायदा बांधकामांपैकी आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय ४४ जणांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल केले. सध्या पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

७४० बांधकामे मुंब्रा, दिवा आणि शीळ भागात

पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ७४० बेकायदा बांधकामे ही मुंब्रा, शीळ आणि दिवा भागात आहेत. त्यातही यामध्ये २८५ झोपड्या, १९७ गोदाम आणि १६८ इमारतींचा समावेश आहे.

प्रभाग समिती     अनधिकृत     कारवाई     अंशत:     एकूण झालेली     एमआरटीपी

बांधकामे         कारवाई     कारवाई     गुन्हे

  • नौपाडा कोपरी     १०     ०९     ०१     १०     ०१
  • वागळे     ०७     ०७     ००     ०७     ००
  • लोकमान्य सावरकर नगर     १६     ०८     ०५    १३     ०५
  • वर्तकनगर     १४     १०     ०४     १४     ००
  • माजिवडा मानपाडा     ३४     २७    ०७     ३४     ०४
  • उथळसर     १४    १२     ०२     १४     ०१
  • कळवा     ४२     ४०     ०२     ४२     १२
  • मुंब्रा     ३२     १७     १५     ३२     १०
  • दिवा     ७४०     ४५     १६     ६१     ११
  • एकूण     ९०९     १७५     ५२     २२७     ४४

५ हजार घरांसाठी १,०३,१६० अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसोबतच ७७ जमिनीच्या विक्रीसाठी आयोजित लॉटरीला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ३ हजार १६० अर्ज आले असून, यापैकी ६९ हजार ६९२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. कोकण मंडळाच्या यापूर्वीच्या लॉटरीला अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अर्जदारांचा आकडा शेवटच्या दिवसापर्यंत दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टच्या रात्री ११:५९ पर्यंत अर्ज करता येईल. २९ ऑगस्टच्या  रात्री ११:५९ पर्यंत अनामत रक्कम भरता येईल. ७ सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर होईल. ९ सप्टेंबरला अर्जदारांना दावे, हरकती करता येतील.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट