शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:31 IST

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनेक भागातील बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेच्या वतीने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गणेशोत्सवानंतर ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात सांगितले आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सुरू होण्यापूर्वी आता शिल्लक राहिलेल्या ६८२ बांधकामांचे वीज, पाणीपुरवठा तोडण्याची कारवाई होणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे. या बांधकामाधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून, येथील घरे रिकामी करण्यासाठी नोटिसाही बजावणार असल्याचेही अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्रा-शीळ भागातील २१ बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेच्या वतीने कारवाई केली. नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत ठाणे पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ९०९ बेकायदा बांधकामांपैकी आतापर्यंत २२७ बांधकामांवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय ४४ जणांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल केले. सध्या पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

७४० बांधकामे मुंब्रा, दिवा आणि शीळ भागात

पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ७४० बेकायदा बांधकामे ही मुंब्रा, शीळ आणि दिवा भागात आहेत. त्यातही यामध्ये २८५ झोपड्या, १९७ गोदाम आणि १६८ इमारतींचा समावेश आहे.

प्रभाग समिती     अनधिकृत     कारवाई     अंशत:     एकूण झालेली     एमआरटीपी

बांधकामे         कारवाई     कारवाई     गुन्हे

  • नौपाडा कोपरी     १०     ०९     ०१     १०     ०१
  • वागळे     ०७     ०७     ००     ०७     ००
  • लोकमान्य सावरकर नगर     १६     ०८     ०५    १३     ०५
  • वर्तकनगर     १४     १०     ०४     १४     ००
  • माजिवडा मानपाडा     ३४     २७    ०७     ३४     ०४
  • उथळसर     १४    १२     ०२     १४     ०१
  • कळवा     ४२     ४०     ०२     ४२     १२
  • मुंब्रा     ३२     १७     १५     ३२     १०
  • दिवा     ७४०     ४५     १६     ६१     ११
  • एकूण     ९०९     १७५     ५२     २२७     ४४

५ हजार घरांसाठी १,०३,१६० अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसोबतच ७७ जमिनीच्या विक्रीसाठी आयोजित लॉटरीला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ३ हजार १६० अर्ज आले असून, यापैकी ६९ हजार ६९२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. कोकण मंडळाच्या यापूर्वीच्या लॉटरीला अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अर्जदारांचा आकडा शेवटच्या दिवसापर्यंत दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टच्या रात्री ११:५९ पर्यंत अर्ज करता येईल. २९ ऑगस्टच्या  रात्री ११:५९ पर्यंत अनामत रक्कम भरता येईल. ७ सप्टेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर होईल. ९ सप्टेंबरला अर्जदारांना दावे, हरकती करता येतील.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट