शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या कडाक्याने पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: April 19, 2016 02:16 IST

कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना

ठाणे: कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना, तर कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी व आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा असून बारवी धरणात २९ टक्के साठा शिल्लक आहे. यावरून, दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळाच्या झळा गडद होऊ लागल्याचे उघड झाले आहे.या धरणांमधील पाणीसाठा १२ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बारवी धरणात ३६ टक्के असलेला पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणात सध्या ५३.७६ दशलक्ष घनमीटर (२९ टक्के) साठा आहे,तर आंध्रातील तीन टककयांनी कमी झालेला पाणीसाठा ६२.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) शिल्लक आहे. पाण्याच्या दैनंदिन वापरासह सतत वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे तो झपाट्याने आटत आहे. पाणीकपात लावलेली असली तरी उपलब्ध साठ्यातून पाण्याचा उपसा हा सुरूच आहे. उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही सुरूच आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आगामी पाणीसंकटाची तीव्रता लक्षात येत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्येही चांगल्या प्रमाणात जागृती झाली आहे. कपात आता त्यांच्या अंगवळणी पडली असली तरी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे जुने स्रोत बळकट करण्यासाठीदेखील प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हा पाणीसाठा याच वेगाने घटत गेल्यास येत्या काही दिवसांत सध्याची पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)> ठाण्यातील पाणखंडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तहानलेलाच ठाणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोडबंदर भागातील पाणखंडा गावातील आदिवासीपाड्याला आजही पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजूबाजूला वसलेल्या नव्या गृहसंकुलांना मुबलक पाणी असताना या पाड्याला मात्र नादुरुस्त बोअरवेल आणि झऱ्याच्या दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पाण्याचे अधिकृत कनेक्शन द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी २४ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. ठाणे शहरात ४८ तासांचे तर कळवा, मुंब्य्राला ६० तासांचे शटडाऊन सुरू आहे. या भागांना किमान पाणीपुरवठा तरी होत आहे. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाण्यात वास्तव्य करीत असलेल्या पाड्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.घोडबंदर येथील पाणखंडा हे आदिवासींचे असेच एक गाव असून येथे सुमारे १५०० लोकांचे वास्तव्य आहे. याच भागात महापालिकेची शाळादेखील आहे. परंतु, या पाड्याला महापालिका स्थापन झाल्यानंतरही आजतागायत पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या पाड्यात पाच बोअरवेल असून त्यातील दोन बंद असून उर्वरित तीन सुस्थितीत आहेत. परंतु, त्यातूनही पिवळसर दूषित पाणी येत असून काही वेळेस किडे आणि मुंग्याही पडत असल्याने त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दूरवर एक किमी अंतरावर असलेल्या एका झऱ्याचे पाणी सध्या पित आहेत. परंतु, ते पिण्यास अयोग्य असेच आहे. पर्याय नसल्याने त्यावरच रहिवाशांना सध्या राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नव्याने निर्माण होणारी गृहसंकुले आणि बंगल्यांना मुबलक पाणी असताना आम्हाला मात्र पाण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्याचा टाहो या आदिवासींनी फोडला आहे. दरम्यान, येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांनी झऱ्याचे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे दिले होते. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार बोअरवेल आणि झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. असे असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने नाइलाजाने या आदिवासींना याच पाण्यावर जीवन व्यतीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे हे पाणी प्यायल्याने लहान मुलांना कावीळ, जुलाब आदींसह इतर आजारांची लागण झाली आहे. (प्रतिनिधी)