शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

उन्हाच्या कडाक्याने पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: April 19, 2016 02:16 IST

कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना

ठाणे: कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना, तर कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी व आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा असून बारवी धरणात २९ टक्के साठा शिल्लक आहे. यावरून, दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळाच्या झळा गडद होऊ लागल्याचे उघड झाले आहे.या धरणांमधील पाणीसाठा १२ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बारवी धरणात ३६ टक्के असलेला पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणात सध्या ५३.७६ दशलक्ष घनमीटर (२९ टक्के) साठा आहे,तर आंध्रातील तीन टककयांनी कमी झालेला पाणीसाठा ६२.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) शिल्लक आहे. पाण्याच्या दैनंदिन वापरासह सतत वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे तो झपाट्याने आटत आहे. पाणीकपात लावलेली असली तरी उपलब्ध साठ्यातून पाण्याचा उपसा हा सुरूच आहे. उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही सुरूच आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आगामी पाणीसंकटाची तीव्रता लक्षात येत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्येही चांगल्या प्रमाणात जागृती झाली आहे. कपात आता त्यांच्या अंगवळणी पडली असली तरी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे जुने स्रोत बळकट करण्यासाठीदेखील प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हा पाणीसाठा याच वेगाने घटत गेल्यास येत्या काही दिवसांत सध्याची पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)> ठाण्यातील पाणखंडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तहानलेलाच ठाणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोडबंदर भागातील पाणखंडा गावातील आदिवासीपाड्याला आजही पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजूबाजूला वसलेल्या नव्या गृहसंकुलांना मुबलक पाणी असताना या पाड्याला मात्र नादुरुस्त बोअरवेल आणि झऱ्याच्या दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पाण्याचे अधिकृत कनेक्शन द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी २४ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. ठाणे शहरात ४८ तासांचे तर कळवा, मुंब्य्राला ६० तासांचे शटडाऊन सुरू आहे. या भागांना किमान पाणीपुरवठा तरी होत आहे. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाण्यात वास्तव्य करीत असलेल्या पाड्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.घोडबंदर येथील पाणखंडा हे आदिवासींचे असेच एक गाव असून येथे सुमारे १५०० लोकांचे वास्तव्य आहे. याच भागात महापालिकेची शाळादेखील आहे. परंतु, या पाड्याला महापालिका स्थापन झाल्यानंतरही आजतागायत पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या पाड्यात पाच बोअरवेल असून त्यातील दोन बंद असून उर्वरित तीन सुस्थितीत आहेत. परंतु, त्यातूनही पिवळसर दूषित पाणी येत असून काही वेळेस किडे आणि मुंग्याही पडत असल्याने त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दूरवर एक किमी अंतरावर असलेल्या एका झऱ्याचे पाणी सध्या पित आहेत. परंतु, ते पिण्यास अयोग्य असेच आहे. पर्याय नसल्याने त्यावरच रहिवाशांना सध्या राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नव्याने निर्माण होणारी गृहसंकुले आणि बंगल्यांना मुबलक पाणी असताना आम्हाला मात्र पाण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्याचा टाहो या आदिवासींनी फोडला आहे. दरम्यान, येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांनी झऱ्याचे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे दिले होते. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार बोअरवेल आणि झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. असे असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने नाइलाजाने या आदिवासींना याच पाण्यावर जीवन व्यतीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे हे पाणी प्यायल्याने लहान मुलांना कावीळ, जुलाब आदींसह इतर आजारांची लागण झाली आहे. (प्रतिनिधी)