शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

उन्हाच्या कडाक्याने पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: April 19, 2016 02:16 IST

कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना

ठाणे: कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना, तर कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी व आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा असून बारवी धरणात २९ टक्के साठा शिल्लक आहे. यावरून, दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळाच्या झळा गडद होऊ लागल्याचे उघड झाले आहे.या धरणांमधील पाणीसाठा १२ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बारवी धरणात ३६ टक्के असलेला पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणात सध्या ५३.७६ दशलक्ष घनमीटर (२९ टक्के) साठा आहे,तर आंध्रातील तीन टककयांनी कमी झालेला पाणीसाठा ६२.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) शिल्लक आहे. पाण्याच्या दैनंदिन वापरासह सतत वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे तो झपाट्याने आटत आहे. पाणीकपात लावलेली असली तरी उपलब्ध साठ्यातून पाण्याचा उपसा हा सुरूच आहे. उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही सुरूच आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आगामी पाणीसंकटाची तीव्रता लक्षात येत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्येही चांगल्या प्रमाणात जागृती झाली आहे. कपात आता त्यांच्या अंगवळणी पडली असली तरी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे जुने स्रोत बळकट करण्यासाठीदेखील प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हा पाणीसाठा याच वेगाने घटत गेल्यास येत्या काही दिवसांत सध्याची पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)> ठाण्यातील पाणखंडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तहानलेलाच ठाणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोडबंदर भागातील पाणखंडा गावातील आदिवासीपाड्याला आजही पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजूबाजूला वसलेल्या नव्या गृहसंकुलांना मुबलक पाणी असताना या पाड्याला मात्र नादुरुस्त बोअरवेल आणि झऱ्याच्या दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पाण्याचे अधिकृत कनेक्शन द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी २४ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. ठाणे शहरात ४८ तासांचे तर कळवा, मुंब्य्राला ६० तासांचे शटडाऊन सुरू आहे. या भागांना किमान पाणीपुरवठा तरी होत आहे. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाण्यात वास्तव्य करीत असलेल्या पाड्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.घोडबंदर येथील पाणखंडा हे आदिवासींचे असेच एक गाव असून येथे सुमारे १५०० लोकांचे वास्तव्य आहे. याच भागात महापालिकेची शाळादेखील आहे. परंतु, या पाड्याला महापालिका स्थापन झाल्यानंतरही आजतागायत पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या पाड्यात पाच बोअरवेल असून त्यातील दोन बंद असून उर्वरित तीन सुस्थितीत आहेत. परंतु, त्यातूनही पिवळसर दूषित पाणी येत असून काही वेळेस किडे आणि मुंग्याही पडत असल्याने त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दूरवर एक किमी अंतरावर असलेल्या एका झऱ्याचे पाणी सध्या पित आहेत. परंतु, ते पिण्यास अयोग्य असेच आहे. पर्याय नसल्याने त्यावरच रहिवाशांना सध्या राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नव्याने निर्माण होणारी गृहसंकुले आणि बंगल्यांना मुबलक पाणी असताना आम्हाला मात्र पाण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्याचा टाहो या आदिवासींनी फोडला आहे. दरम्यान, येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांनी झऱ्याचे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे दिले होते. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार बोअरवेल आणि झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. असे असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने नाइलाजाने या आदिवासींना याच पाण्यावर जीवन व्यतीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे हे पाणी प्यायल्याने लहान मुलांना कावीळ, जुलाब आदींसह इतर आजारांची लागण झाली आहे. (प्रतिनिधी)