शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या कडाक्याने पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: April 19, 2016 02:16 IST

कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना

ठाणे: कडक उन्हामुळे ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांना, तर कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी व आंध्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा असून बारवी धरणात २९ टक्के साठा शिल्लक आहे. यावरून, दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळाच्या झळा गडद होऊ लागल्याचे उघड झाले आहे.या धरणांमधील पाणीसाठा १२ दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बारवी धरणात ३६ टक्के असलेला पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी झाला आहे. या धरणात सध्या ५३.७६ दशलक्ष घनमीटर (२९ टक्के) साठा आहे,तर आंध्रातील तीन टककयांनी कमी झालेला पाणीसाठा ६२.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) शिल्लक आहे. पाण्याच्या दैनंदिन वापरासह सतत वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे तो झपाट्याने आटत आहे. पाणीकपात लावलेली असली तरी उपलब्ध साठ्यातून पाण्याचा उपसा हा सुरूच आहे. उन्हाची तीव्रताही वाढत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही सुरूच आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे आगामी पाणीसंकटाची तीव्रता लक्षात येत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकांमध्येही चांगल्या प्रमाणात जागृती झाली आहे. कपात आता त्यांच्या अंगवळणी पडली असली तरी उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे जुने स्रोत बळकट करण्यासाठीदेखील प्रशासनाने युद्धपातळीवर उपक्रम हाती घेण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. हा पाणीसाठा याच वेगाने घटत गेल्यास येत्या काही दिवसांत सध्याची पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)> ठाण्यातील पाणखंडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून तहानलेलाच ठाणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोडबंदर भागातील पाणखंडा गावातील आदिवासीपाड्याला आजही पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजूबाजूला वसलेल्या नव्या गृहसंकुलांना मुबलक पाणी असताना या पाड्याला मात्र नादुरुस्त बोअरवेल आणि झऱ्याच्या दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला आता पाण्याचे अधिकृत कनेक्शन द्यावे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी २४ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचे पडसाद आता तीव्र उमटू लागले आहेत. ठाणे शहरात ४८ तासांचे तर कळवा, मुंब्य्राला ६० तासांचे शटडाऊन सुरू आहे. या भागांना किमान पाणीपुरवठा तरी होत आहे. परंतु, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाण्यात वास्तव्य करीत असलेल्या पाड्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.घोडबंदर येथील पाणखंडा हे आदिवासींचे असेच एक गाव असून येथे सुमारे १५०० लोकांचे वास्तव्य आहे. याच भागात महापालिकेची शाळादेखील आहे. परंतु, या पाड्याला महापालिका स्थापन झाल्यानंतरही आजतागायत पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या पाड्यात पाच बोअरवेल असून त्यातील दोन बंद असून उर्वरित तीन सुस्थितीत आहेत. परंतु, त्यातूनही पिवळसर दूषित पाणी येत असून काही वेळेस किडे आणि मुंग्याही पडत असल्याने त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी दूरवर एक किमी अंतरावर असलेल्या एका झऱ्याचे पाणी सध्या पित आहेत. परंतु, ते पिण्यास अयोग्य असेच आहे. पर्याय नसल्याने त्यावरच रहिवाशांना सध्या राहावे लागत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नव्याने निर्माण होणारी गृहसंकुले आणि बंगल्यांना मुबलक पाणी असताना आम्हाला मात्र पाण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करावा लागत असल्याचा टाहो या आदिवासींनी फोडला आहे. दरम्यान, येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांनी झऱ्याचे आणि बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे दिले होते. या विभागाने दिलेल्या अहवालानुसार बोअरवेल आणि झऱ्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. असे असले तरी दुसरा पर्यायच नसल्याने नाइलाजाने या आदिवासींना याच पाण्यावर जीवन व्यतीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे हे पाणी प्यायल्याने लहान मुलांना कावीळ, जुलाब आदींसह इतर आजारांची लागण झाली आहे. (प्रतिनिधी)