शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:24 AM

अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरणाविरोधात अंबरनाथ शिवसेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरसकट दोन दिवस बंद न घेता २४-२४ तासांचे दोन बंद आठवडाभरात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही मागणी लागलीच मान्य करण्यात आली. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी हजर राहावे, अशी मोर्चेकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण होते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे (प्रभारी) यांच्या अखत्यारीत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, अधिकाºयांच्या चुकीचा भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. वितरणव्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गळती, दूषित पाणीपुरवठा या मुख्य समस्यांवर अनेकदा चर्चा करूनही त्यावर कोणतेच ठोस निर्णय अधिकाºयांमार्फत घेण्यात आलेले नाहीत. शहरात पाणीसमस्या त्रासदायक असतानाही अधिकारी नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शांतताभंग करेल, या भीतीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाला बंदोबस्त दिला होता. मोर्चेकºयांच्या वतीने अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, चंद्रकांत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, प्राधिकरणाच्या मनीषा पलांडे या अंबरनाथला न आल्याने वाळेकर यांनी संताप व्यक्त केला. पलांडे यांना पूर्वकल्पना देऊनही अधिकारी येत नसतील, तर पाणीप्रश्नावर ते गंभीर नाहीत, असेच दिसत असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला. जोपर्यंत ते येत नाही, तोवर मोर्चा हलणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अखेर, सहा. पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी तडजोड करून चर्चा करण्यास भाग पाडले.शासनाच्या आदेशाप्रमाणे ३७ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वितरणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तीन दिवस पाणी बंद आहे. प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तसेच शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन मुख्य मागण्यांवर प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यावर हा मोर्चा माघारी निघाला. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे