शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कलचाचणीबाबत गांभीर्य आवश्यक, विवेक पंडित यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:10 IST

विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र, कलचाचणीच्या निष्कर्षाकडे ५० टक्के पालक आणि विद्यार्थी दुर्लक्ष करतात. पारंपरिक पद्धतीनेच करिअरनिवडीकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे कलचाचणीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सजगता आणि गांभीर्य वाढणे आवश्यक आहे, असे मत विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.पंडित म्हणाले की, करिअरचे अनेक पर्याय आहेत; मात्र माहितीअभावी पालक आणि विद्यार्थी त्याबाबत द्विधा मन:स्थितीत असतात. त्यामुळे परिस्थितीजन्य कारणाअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने त्यांना भविष्यात चाचपडावे लागते. विद्यार्थ्यांमधील वेगळेपण जाणण्यासाठी महाराष्ट्रातील दहावीच्या राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी दरवर्षी घेण्यात येते. यंदाच्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता ओळखता येण्यासाठी अभिक्षमताचाचणीही घेतली जात आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आवडीचे क्षेत्र, त्यासाठी आवश्यक क्षमता या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे जाणून घेतली जात आहे. मंडळातर्फे राबवला जाणारा हा चांगला उपक्रम असला, तरीही पालक आणि विद्यार्थी त्यांनी ठरवलेले करिअरच निवडतात, असेही त्यांनी सांगितले.नव्याने विकसित केलेल्या या कलचाचणीत कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य, विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रांमधील अभिरुचीचे मापन केले जाते. ही एक चांगली बाब आहे. आता कलचाचणी ही सर्वसमावेशक बनवली आहे. त्यामुळे पारंपरिक करिअरच्या वाटा सोडून विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रनिवडीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे पंडित म्हणाले.नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गगरे म्हणाल्या की, राज्य मंडळाने विद्यार्थ्यांसाठी करिअरनिवडीसाठी एक चांगली संधी दिली आहे. पण, विद्यार्थी त्यात विचार करत नाही. विद्यार्थ्यांनी विचार करून पर्याय निवडले पाहिजेत. कलचाचणीसाठी दीड तास वेळ दिला आहे. विचारपूर्वक उत्तरे ते निवडू शकतात, पण बºयाचदा ते तसे करत नाहीत. बोर्डाचा निकाल येण्यापूर्वी कलचाचणीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती येतो. यंदा कलचाचणीच्या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुटीत हे व्हिडीओ पाहता येतील. समुपदेशकांकडून मार्गदर्शनही घेता येईल.यंदा विविध क्षेत्रांची माहिती : सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील म्हणाले की, कलचाचणीनुसार ३० ते ३५ टक्के विद्यार्थीच करिअर निवडतात. आजपर्यंतच्या कलचाचण्या फार गांभीर्याने घेतल्या नाहीत. यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रांची माहिती दिली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना करिअर म्हणजे काय, हे नीट समजत नव्हते. विविध क्षेत्रांची माहिती दिली जात नव्हती. यंदा विविध पर्याय दिल्याने या वर्षापासून विद्यार्थी व पालकांचा कल वाढू शकतो. कलचाचणीच्या निकालानुसार ते करिअर निवडतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र