शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

‘त्या’ नगरसेवकांच्या गावात संघर्ष समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:34 AM

२७ गावांचा मुद्दा : विरोधकांशी साधणार संवाद

कल्याण : केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास काही नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली आहे.

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक गोपनीय बैठक पार पाडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, गगाजन मांगरूळकर, दत्ता वझे आदी उपस्थित होते.महापालिकेतून २७ गावे वगळू नयेत, अशी मागणी केवळ पाच नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी समितीचे पदाधिकारी संवाद साधणार आहेत. त्यातून गाव वगळण्यास नागरिकांचा विरोध आहे की, तेथील नगरसेवक समितीच्या भूमिकेच्या विरोधात आहे, हे स्पष्ट होईल. संवाद साधण्याची ही प्रक्रिया मंत्रालयात पुन्हा दुसरी बैठक होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.२०१५ मध्ये समितीने महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपने कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले. समितीचा पाठिंबा होता म्हणून हे नगरसेवक निवडून आले.भाजपने निवडणुकीतही फसवणूक केली. तसेच पाच वर्षे गावे वगळण्याचे गाजर दाखविले. आता महाविकास आघाडी सरकारकडून गावे वगळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार काही मंडळी करीत असल्याचा आरोप समितीने बैठकीत केला.पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत२७ गावांबाबत शिवसेनेची भूमिका यापूर्वी वेगळी होती. आता शिवसेना अनुकूल होत असताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका