शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Virar Building Collapse: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:51 IST

Virar Building Collapse News Marathi: विरार पूर्व भागात रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला.

नालासोपारा - विरार येथील रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची मागणी भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनेचा आढावा घेऊन मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांना पाठवून पीडितांना साह्य केले. 

गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच विरार पूर्व भागात रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ रहिवाशांचा मृत्यू झाला. 

मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या एक वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ९ रहिवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार राजन नाईक यांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल व मनपाच्या आपत्कालीन विभागाकडून बचावकार्याबाबत माहिती घेतली होती. 

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव आर्थिक मदत करावी. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनाही दुर्घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली होती. 

मंत्री गिरीष महाजन यांनी आज दुपारी विरारला भेट दिली.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली अशी माहिती भाजपा वसई विरार जिल्हा महासचिव मनोज बारोट यांनी दिली आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाVirarविरारVasai Virarवसई विरारDeathमृत्यूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस