शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नियमांचे उल्लंघन, बेकायदा भाडेवाढ लादली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:43 PM

अनलॉकनंतरचे चित्र : रिक्षा प्रवास झाला धोकादायक, व्यवसाय नसल्याने चालकांवर आली उपासमारीची वेळ

ठाणे : ‘अनलॉक’च्या प्रक्रियेमध्ये रिक्षामध्ये केवळ दोनच प्रवाशांना अनुमती आहे. याचे ठाणे शहरात काही ठिकाणी काटेकोर पालन केले जात आहे. तर, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसविले जात आहेत. दोघांचे भाडे परवडत नसल्यामुळे शेअर रिक्षाचालकांनी यात दुप्पट वाढ केली आहे. तोंडाला मास्क आणि स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर होतोय. पण, व्यवसायावरही प्रचंड परिणाम झाल्यामुळे घर कसे चालवायचे, या चिंतेत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोनामुळे पाच महिने लॉकडाऊन सुरू होते. या काळात रिक्षा व्यवसाय संपूर्णपणे बंद होता. आता अनलॉकच्या प्रक्रियेत रिक्षामध्ये दोन प्रवाशांच्या वाहतुकीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय, रिक्षात प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये प्लास्टिकचा कागद लावणे, सॅनिटायझर ठेवणे आणि तोंडाला मास्क लावणे, हे बंधनकारक आहे. मानपाडा परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अगदी हॅण्डग्लोव्हजसह वरील सर्वच नियमांचे आपण पालन करीत असल्याचे मानपाडा येथील रिक्षाचालक बालाजी गुंडाळे यांनी सांगितले. अजूनही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रतिसाद कमी आहे. तरीही, काही प्रवासी मास्क वापरत नाहीत, दुर्लक्ष करतात. याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

दोन प्रवाशांमध्ये भाडे कमी मिळते. मग, काही ठिकाणी सर्रास शेअर रिक्षामध्ये तीन किंवा चार प्रवासी घेऊन जाण्याकडेही कल असल्याचे पाहायला मिळते. कोरोनाची गांभीर्यता लक्षात घेता दोनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्यांपेक्षा बसणाऱ्यांनीच अधिक खबरदारी घ्यायला हवी, असा सल्लाच एका रिक्षाचालकाने दिला आहे. ज्या रिक्षा मीटरप्रमाणे चालतात, त्यांचा भाडेआकार स्थिर आहे. त्यात प्रवासीही एक किंवा दोनच घेतले जातात. एकाच कुटुंबातील तीन प्रवासी आले, तर मात्र त्यांना रिक्षात घेण्यात येत असल्याचेही ठाणे रेल्वेस्थानक येथील काही रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे सांगितले.शेअर रिक्षामध्येही दोन प्रवाशांनाच परवानगी असल्यामुळे तीन प्रवाशांचे भाडे दोघांमध्ये विभागले जाते. त्यामुळे मानपाडा ते कासारवडवली, माजिवडा, वाघबीळ आणि पातलीपाडा या मार्गांवरील शेअर भाडे दुप्पट झाले आहे. मानपाडा ते माजिवडा आधी १० रुपये घेतले जायचे. ते आता २० रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे कापूरबावडी ते ठाणे रेल्वेस्थानक २० वरून ३० रुपये, लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक १८ वरून ३०, तीनहातनाका ते ठाणे स्थानक १० ऐवजी २० रुपये, नितीन कंपनी ते स्थानक १३ ऐवजी २० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्येच्या नियमाचा भुर्दंड हा प्रवाशांना सहन करावा लागत आहे.सॅनिटायझरचा वाढला खर्चदिवसभरात २५० रुपये कमवल्यानंतर गॅस आणि रिक्षामालकाला पैसे दिल्यानंतर घर चालवायचे कसे, असा यक्षप्रश्न असल्याचे राबोडीतील महंमद सलमानी यांनी सांगितले. त्यात सॅनिटायझरचाही खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत दोनपेक्षा अधिक प्रवासी घेत नसल्याचे कोरोनावर मात केलेले मनोरमानगर येथील रिक्षाचालक नाना वारभुवन यांनी सांगितले. मास्क आणि सॅनिटायझरचाही ते कटाक्षाने वापर करतात. कोरोनामुळे व्यवसायावर प्रचंड परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.लोकल बंदचा परिणामरेल्वेसेवा केवळ मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असल्यामुळे त्याचाही परिणाम रिक्षा व्यवसायावर झाल्याचे कळवा येथील चालक हरीश पगारे म्हणाले. मीटरप्रमाणे केवळ दोनच प्रवाशांना घेऊन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचेही ते म्हणाले. नियमाप्रमाणे दोन प्रवासी घेतो, मात्र एकाच कुटुंबातील असतील, तरच तीन प्रवासी तेही मीटरप्रमाणेच घेत असल्याचे मानपाडा येथील संगीता रवींद्र पाफळे यांनी सांगितले.

चालक, प्रवासीही विनामास्क फिरतातहाजुरी, मुंब्रा या भागांत रिक्षाचालक आणि काही प्रवासीही सर्रास मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळले. सकाळच्यावेळी सर्रास माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी या भागांत नियमांचे उल्लंघन करीत दोनऐवजी तीन ते चार प्रवासी एकाच रिक्षात कोंबले जात असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. अशा प्रवासी आणि चालकांमुळे मग कोरोना संसर्ग वाढणार नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.

300 ते 500रुपये मिळतातप्रचंड मेहनत घेऊनही जिथे आधी संपूर्ण दिवसभरात एक हजार रुपये मिळायचे, तिथे केवळ ३०० ते ५०० रुपये हातावर पडतात, असे सुरेंद्र सिंग या इंदिरानगर येथील रिक्षाचालकाने सांगितले. शेअरपेक्षा मीटरवरच भर देत असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याचे मुन्ना यादव या ऐरोलीतून ठाण्यात व्यवसायासाठी येणाºया चालकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस