शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलिसांनी केली साडे तीन हजार वाहने जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: April 20, 2020 23:25 IST

संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे 25 लाख 84 हजाराचा दंड वसूलउल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक 550 वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुगांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे ठाणे शहर पोलिसांनीही विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा फास आवळण्यास जोरदार सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. अशा विनाकारण वाहन घेऊन फिरणा-यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संचारबंदी लागू झाल्यापासून 25 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाºयांची 550 वाहने जप्त केली. यामध्ये 298 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये रिक्षा, मोटारसायकल आणि कार आदी वाहनांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या विविध पथकांनी 228 वाहनांवर कारवाई करु न 10 गुन्हे दाखल केले. कल्याणमध्ये उपायुक्त व्ही. एम. पानसरे यांच्या विविध पथकांनी 390 वाहने जप्त करीत 245 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली. उल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 641 वाहनांवर जप्तीची कारवाई उपायुक्त पी. पी. शेवाळे यांच्या पथकांनी केली. याठिकाणी १७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 516 वाहन चालकांवर कारवाई केली. याठिकाणी २०९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने घेऊन फिरणाºयांची तीन हजार 356 वाहने जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 779 जणांविरु द्ध कलम 188 तसेच मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.-------वाहतूक पोलिसांनी केला 25 लाखाचा दंड वसूलठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 युनिटच्या वाहतूक पथकांनी विनाकारण फिरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेनेही आतापर्यंत एक हजार 25 वाहने जप्त केली. त्यांच्याकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केला आहे. जप्त केलेली वाहने संचारबंदी शिथिल झाल्यानंतरच संबंधित चालकांना परत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस