शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलिसांनी केली साडे तीन हजार वाहने जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: April 20, 2020 23:25 IST

संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे 25 लाख 84 हजाराचा दंड वसूलउल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक 550 वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुगांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे ठाणे शहर पोलिसांनीही विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा फास आवळण्यास जोरदार सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. अशा विनाकारण वाहन घेऊन फिरणा-यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संचारबंदी लागू झाल्यापासून 25 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाºयांची 550 वाहने जप्त केली. यामध्ये 298 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये रिक्षा, मोटारसायकल आणि कार आदी वाहनांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या विविध पथकांनी 228 वाहनांवर कारवाई करु न 10 गुन्हे दाखल केले. कल्याणमध्ये उपायुक्त व्ही. एम. पानसरे यांच्या विविध पथकांनी 390 वाहने जप्त करीत 245 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली. उल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 641 वाहनांवर जप्तीची कारवाई उपायुक्त पी. पी. शेवाळे यांच्या पथकांनी केली. याठिकाणी १७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 516 वाहन चालकांवर कारवाई केली. याठिकाणी २०९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने घेऊन फिरणाºयांची तीन हजार 356 वाहने जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 779 जणांविरु द्ध कलम 188 तसेच मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.-------वाहतूक पोलिसांनी केला 25 लाखाचा दंड वसूलठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 युनिटच्या वाहतूक पथकांनी विनाकारण फिरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेनेही आतापर्यंत एक हजार 25 वाहने जप्त केली. त्यांच्याकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केला आहे. जप्त केलेली वाहने संचारबंदी शिथिल झाल्यानंतरच संबंधित चालकांना परत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस