शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

करियरमध्ये उंची गाठण्यासाठी अनेक वर्ष तपस्या करावी लागते- विनिता ऐनापुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 22:19 IST

पै फेण्ड्स लायब्ररी आणि कांचनगौरी महिला पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री कर्तृत्वाचा महनीय अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डोंबिवली- कोणतीही महिला आपल्या करियरमध्ये उत्तुंग शिखर गाठते ते तिला एका दिवसात मिळविता येत नाही. आपले नाव एक उंचीवर नेण्यासाठी त्यांना खूप काळ प्रयत्न करावे लागतात. गेली ३५ वर्ष मी लिखाण करीत आहे तेव्हा आता कुठे त्याला मान्यता मिळत आहे, असे मत सुप्रसिध्द लेखिका विनिता ऐनापुरे यांनी व्यक्त केले.

पै फेण्ड्स लायब्ररी आणि कांचनगौरी महिला पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री कर्तृत्वाचा महनीय अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्त्रीच्या अंगीभूत कुशलतेमुळे कामातील, सुबकतेमुळे चिकाटी व कुशाग्र बुध्दीमुळे महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून आपल्या कार्यकर्तत्वाचा ठसा त्यांनी समाजमनावर उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी प्रकाशन क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऐनापुरे बोलत होत्या. शुभम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. संगीता चव्हाण, विद्या फडके, अनुपमा उजगरे, नम्रता मुळे, वैशाली मेहेत्रे, शुभांगी पांगे या प्रकाशन क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पै फेण्ड्स लायब्ररीचे पुडंलिक पै आणि कांचनगौरी महिला पतपेढीच्या उर्मिला प्रभूघाटे, मुक्त पत्रकार मीना गोडखिंडी आदी मान्यवर उपस्थित होते.ऐनापुरे म्हणाले, समाजाचा विरोध पत्कारून आपल्या पत्नीला पुढे पाठविणे हे सोपे नव्हते तरीही ते काम गोपाळरावांनी केले. त्यांनी आनंदीबाईंना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठविले. महात्मा फुले हे देखील सावित्रीबाईंच्या मागे ठामपणे उभे होते. स्त्रियांना घरातून वाव मिळतो तेव्हाच ती निश्चितपणे कार्य करू शकते. आज ही एक ही असे क्षेत्र नाही त्या क्षेत्रात महिला नाही. या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी स्त्रियांना झगडावे लागले आहे. पण नाउमेद कुणीच झाले नाही. स्त्रियांनी व्यवसाय क्षेत्रात ही पावले टाकायला सुरूवात केली आहे. पण प्रकाशन हा व्यवसाय इतर व्यवसायापेक्षा वेगळा आहे. एखादया लेखकांचे लिखाण त्या वाचतात. त्यांना पटले तर ते छापण्याचा निणर्य घेतात. ते लिखाण पटले नाही तर प्रश्न उरत नाही. परंतु ते लिखाण छपाई करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे खरे काम तिथून सुरू होते. प्रकाशकाला संयम ठेवावा लागतो. त्या व्यतिरिक्त मुखपृष्ठ, कागदाचा दर्जा, बायडिंग असे विविध प्रकाराची कामे करावी लागतात. वाचक हा त्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याने या व्यवसायाकडे पाठ फिरविता कामा नये. प्रकाशकाला लेखकांची जात, धर्म या गोष्टीशी काहीच देणं घेणं नसते म्हणूनच हा व्यवसाय वेगळा आहे, असे ही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता छेडा आणि धनश्री साने यांनी केले तर प्रास्ताविक उर्मिला प्रभूघाटे आणि पुडंलिक पै यांनी केले. प्रकाशक महिलांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :WomenमहिलाCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन