शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 20:08 IST

विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत होते.

कल्याण : अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने युजीसीच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे परीक्षा घेण्याचा निकाल लागला. या निकालावर विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी कल्याणच्या तहसीलदार ऑफिसला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र दिले. निर्णय जर सात दिवसात रद्द करण्याचा वटहुकूम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला नाही, तर विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल, असे राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

विद्यार्थी भारतीकडून अनेक इमेल पाठवून, रक्ताच्या ठस्याचे पत्र पाठवून, ट्विट करून ,आंदोलने करून ,उपोषण करून, मोदींची पहाटे चार वाजता काकड आरती करून, भजन करून ,कीर्तन करून, यूजीसीची प्रेतयात्रा काढून, बोंबा मारो आंदोलन करूनही या सरकारने काहीही सकारात्मक प्रतिसाद न देता  विद्यार्थ्यांच्या जीवावर टांगती तलवार ठेवली.  वारंवार तारखांवर तारखाच दिल्या, असे म्हणणे धुरी यांनी मांडले. विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ज्याची भीती होती, अखेर तेच झाले. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले आईवडील गमावले आहेत. बेरोजगारीमुळे अन्न धान्याचाही तुटवडा आहे. अशावेळी विद्यार्थी कोणत्या मानसिकतेने परीक्षा देतील. हा साधा माणुसकीचा प्रश्न युजीसी ला का पडला नसावा,   असे विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा मुधाने यांनी सांगितले.

मागील अनेक महिने विद्यार्थी भारती संघटना कोरोना काळात सर्वत्र महामारी पसरली असताना अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मृत्यूच्या सापळ्यात अडकवले जाऊ नये म्हणून प्राण पणाला लावून लढत आहे.  यापुढेही लढणार असे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाStudentविद्यार्थीdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस