शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पदे रद्द होण्यामागे बेफिकिरी? जिल्हाधिकारी, आयुक्तांवर लोकप्रतिनिधींचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:33 IST

आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास संबंधित महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकारी हेही तेवढेच

नारायण जाधव ठाणे : आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास संबंधित महापालिकांचे आयुक्त व जिल्हाधिकारी हेही तेवढेच जबाबदार आहेत. नगरसेवक, जि.प. व पंचायत समिती सदस्यांना हे प्रमाणपत्र मिळावे, याकरिता आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे आदेश यापूर्वी दिले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीबरोबरच आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बेफिकिरी या निकालाच्या मुळाशी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कोल्हापूर महापालिकेतील २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याचा फटका राज्यातील नगरपालिकांसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये आरक्षित जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बसणार आहे. मात्र, त्यास संबंधित लोकप्रतिनिधी, जातपडताळणी समिती तसेच त्यात्या महापालिकांचे आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तेवढेच जबाबदार असल्याचे शासनाच्या याबाबतच्या आदेशावरून उघड झाले आहे. गेल्या वर्षी फेबु्रवारी महिन्यात झालेल्या १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाºया उमेदवारांना दिलासा देण्यासाठी उच्च न्यायालयाने ९ डिसेंबर २०१६ रोजी एका निर्णयावर नोंदवलेल्या निरीक्षणानुसार शासनाने जानेवारी महिन्यात हे आदेश काढले.

निवडणुकांत अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढवून निवडून येणाºया उमेदवारांना आपले जातप्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, संबंधित जातपडताळणी समितीकडून वेळेत हे प्रमाणपत्र न मिळाल्याने काही ठिकाणी संबंधिताचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही अडचण लक्षात घेऊन आरक्षित जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना निर्धारित मुदतीत त्यांचे जातप्रमाणपत्र मिळावे, यासाठी संबंधित महापालिकांच्या आयुक्तांसह नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनीही विभागीय जातप्रमाणपत्र समित्यांकडे पाठपुरावा करावा, असे म्हटले होते. या आदेशापूर्वी आपले सदस्यत्व रद्द होऊ नये, म्हणून निवडून आलेल्या सदस्यांकडूनच संबंधित विभागीय जातपडताळणी समितीकडे जातप्रमाणपत्रासाठी पाठपुरावा केला जात होता. त्यांचे एकट्याचे प्रयत्न कमी पडत असल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी आणि आयुक्तांवरही पाठपुराव्याची जबाबदारी सोपवणारे हे आदेश काढले होते.

काय होते ते शासन आदेशनगरपालिका, महापालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित जागांवर निवडून येणाºया सदस्यांच्या नावांसह त्यांचे प्रभाग, ते कोणत्या जातीचे आहेत, ते कोणत्या तारखेस निवडून आले व त्यांचे जातप्रमाणपत्र सादर करण्याची मुदत कधी संपत आहे, याची माहिती सर्व तपशिलासह वेळेत विभागीय जातपडताळणी समितीकडे पाठवून त्याचा तातडीने पाठपुरावा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना शासनाने दिले होते. यासाठी संबंधित सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग, आदिवासी विकास विभागाने संबंधित विभागीय जातपडताळणी समित्यांना अशा सदस्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्याचे बंधन घालावे, असे नगरविकास विभागाने त्यात म्हटले होते.हे प्रभाग आरक्षितराज्यातील महापालिकांमध्ये अनुसूचित जातीचे १७२, जिल्हा परिषदेत १८९, तर पंचायत समितीत ३८६ प्रभाग आहेत. तसेच महापालिकांमध्ये अनुसूचित जमातींचे ३८, जिल्हा परिषदेत १५६ आणि पंचायत समितीत २९३ प्रभाग आरक्षित आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण