शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:58 IST

महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. याविरोधात माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी आवाज उठवून पुतळयाची अवहेलना थांबवण्याची विनंती केली आहे.महापालिकेने शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, उघानांमध्ये २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. त्यांची निगा व पावित्र्य राखण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आठवडयातून एकदा पुतळयाची पाण्याने साफसफाई करून रोज फुलांचा हार अर्पण करण्याचे काम यापूर्वी बांधकाम विभागाकडून करण्यात येत होते. ते आजही केले जात असल्याचा दावा विभागाने केला असला तरी, त्यांचा खोटारडेपणा मालवणकर यांनी उघड केला आहे. मालवणकर यांनी काही दिवसांपूर्वी हिराघाट येथील सरदार वल्लभभाई पटेल व जयप्रकाश नारायण यांचा पुतळा धुळीने माखलेला असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.मालवणकर यांनी टाकलेल्या फोटोनंतर महापालिकेने शहरातील पुतळयांची स्वच्छता करून हार अर्पण केले. मात्र त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय आला. पुतळे पुन्हा धुळीने माखले असून हार उन्हामुळे पूर्णत: वाळल्याचे फोटो मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले. ७०० कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेला राष्ट्रपुरूष, संत व सुधारकांच्या पुतळयाची निगा व पावित्र्य राखता येत नसल्याचे पुन्हा उघड केले. पुतळ््यांची महापालिकेकडून होणारी अवहेलना थांबत नसल्याने, सामान्य नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, वीर सावरकर, जिजामाता व बालशिवाजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, रवींद्रनाथ टागोर, संत कंवाराम, स्वामी शांतीप्रकाश, शहीद हेमू कलानी, स्वामी दयानंद स्वरस्वती आदी २२ पुतळे बसवले आहेत. कंत्राटदारामार्फत हे काम करत असून त्यावर लाखोंचा खर्च दाखवला जातो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर