शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

उल्हासनगरमध्ये पुतळे बेवारस,पालिकेचे दुर्लक्ष : स्वच्छतेचा पत्ताच नाही, अवहेलना थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:58 IST

महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. याविरोधात माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी आवाज उठवून पुतळयाची अवहेलना थांबवण्याची विनंती केली आहे.महापालिकेने शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, उघानांमध्ये २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. त्यांची निगा व पावित्र्य राखण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आठवडयातून एकदा पुतळयाची पाण्याने साफसफाई करून रोज फुलांचा हार अर्पण करण्याचे काम यापूर्वी बांधकाम विभागाकडून करण्यात येत होते. ते आजही केले जात असल्याचा दावा विभागाने केला असला तरी, त्यांचा खोटारडेपणा मालवणकर यांनी उघड केला आहे. मालवणकर यांनी काही दिवसांपूर्वी हिराघाट येथील सरदार वल्लभभाई पटेल व जयप्रकाश नारायण यांचा पुतळा धुळीने माखलेला असल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.मालवणकर यांनी टाकलेल्या फोटोनंतर महापालिकेने शहरातील पुतळयांची स्वच्छता करून हार अर्पण केले. मात्र त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय आला. पुतळे पुन्हा धुळीने माखले असून हार उन्हामुळे पूर्णत: वाळल्याचे फोटो मालवणकर यांनी सोशल मीडियावर टाकले. ७०० कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेला राष्ट्रपुरूष, संत व सुधारकांच्या पुतळयाची निगा व पावित्र्य राखता येत नसल्याचे पुन्हा उघड केले. पुतळ््यांची महापालिकेकडून होणारी अवहेलना थांबत नसल्याने, सामान्य नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण, वीर सावरकर, जिजामाता व बालशिवाजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहाद्दूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, रवींद्रनाथ टागोर, संत कंवाराम, स्वामी शांतीप्रकाश, शहीद हेमू कलानी, स्वामी दयानंद स्वरस्वती आदी २२ पुतळे बसवले आहेत. कंत्राटदारामार्फत हे काम करत असून त्यावर लाखोंचा खर्च दाखवला जातो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर