शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रंगणार शिवसेना विरुद्ध आव्हाड सामना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:49 IST

राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी

ठळक मुद्देराज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी

सदानंद नाईक उल्हासनगर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य शिवसेनेने खोडीत काढून राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नसून शासनाने गेल्या सहा महिन्यात शहर विकासासाठी १२५ कोटींचा निधी दिला, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून हजारो नागरिक विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त होते. दरम्यान उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती व धोकादायक इमारती मधील नागरिकांनी शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी बोलाविले होते. यावेळी आव्हाड यांनी ईगल येथील पत्रकार परिषदेत १५ दिवसात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची चर्चा व बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य शासनाची तिजोरी रिकामी असल्याचे सांगून कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाते, असे बोलताना सांगितले.

याप्रकारने शिवसेनेत हलचल निर्माण झाली. राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी शासनाची तिजोरीत खळखळाट असल्याचे केलेले व्यक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान आदींनी प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल मध्ये शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. सहा महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी राज्य शासनाने ७५ कोटींचा निधी दिला असून धोकादायक इमारती मधून बेघर होणाऱ्या नागरिकां साठी निवारा केंद्र व इतर सुविधेसाठी ५० कोटींचा निधी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता भरत गंगोत्री यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागातील विकास कामांसाठी २६ कोटींचा निधी दिला. शासनाची तिजोरीत खळखळाट असतीतर शासनाने विकास कामासाठी कोट्यवधींची दिला असता का? असा प्रश्न शिवसेनेने केला. एकूणच शहरातील समस्या सोडविण्यासाठी श्रेयवाद निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून आव्हाड विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्रShrikant Shindeश्रीकांत शिंदे