शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरातील सत्तांतराला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:57 IST

विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष समित्यांत शिवसेनेला वाटा दिला जाईल आणि जुलैत त्या पक्षाला उपमहापौरपद दिले जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहे. अन्य पदांच्या वाटपाबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा सुरू असल्याने स्थानिक पदाधिकारी फारसे बोलण्यास उत्सुक नाहीत.या घडामोडींमुळे कलानी कुटुंबाचा नवा राजकीय प्रवास सुरू होईल, तर दशकभर किंगमेकर म्हणून आर्थिक नाड्या हाती ठेवणाºया साई पक्षाचे महत्त्व संपुष्टात येईल, अशी चर्चा भाजपा-शिवसेनेच्या वर्तुळात आहे.शिवसेनेने युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने उल्हासनगर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने ओमी टीमचा वापर करून घेतला. या टीमच्या बहुतांश उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या ३३ पैकी २२ नगरसेवक ओमी टीमचे असल्याचा दावा कलानी कुटूंबाकडून होत असला, तरी नव्या राजकीय घडामोडींत हे २२ नगरसेवक भाजपातून फुटून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. भाजपासोबत सत्तेत असल्याचे राजकीय फायदे त्यांना सोडायचे नाहीत. त्यामुळे भाजपात पुढील काळात आयलानी समर्थक आणि कलानी समर्थक असे दोन्ही गट अस्तित्त्वात राहतील. त्यातही कलानी समर्थकांना जर सत्तेचे लाभ मिळाले, तर त्यांचा राजकीय विरोध मावळत जाईल. सध्या त्याचीच भीीत ओमी कलानी यांना आहे.उल्हासनगरच्या सत्तेत शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल तर भाजपाने कल्याण-डोंबिवली महापौरपदावरील दावा सोडावा, ही शिवसेनेची प्रमुख अट होती. ती भाजपाने मान्य केल्याने पुढील आठवड्यात होणाºया विशेष समितीच्या सदस्य आणि सभापतीपदाच्या निवडीत शिवसेनेला स्थान देत भाजपा-शिवसेनेची युती करण्याची प्रक्रिया सुरू होईल.जुलै महिन्यात महापौर मीना आयलानी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपणार होता. ते पद पंचम ओमी कलानी यांच्याकडे जाणार होते. मात्र आयलानी या पदावर कायम राहतील. कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात भाजपाने हे पद पदरात पाडून घेतले आहे. साई पक्षाचे जीवन इदनानी यांचा सव्वा वर्षाचा कालावधी मात्र संपेल आणि त्यांना हे पद सोडावे लागेल. त्यानंतर हे पद शिवसेनेला दिले जाईल. या पदापासून शिवसेनेचा सत्तेतील सहभाग औपचारिकपणे सुरू होईल, असे दिसते.पप्पू कलानी पुन्हा येरवडा कारागृहातगेल्यावर्षी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपा आणि ओमी टीमच्या महाआघाडीचे चित्र स्पष्ट होताच भाजपाच्या एका मंत्र्याच्या मध्यस्थीने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानी यांना येरवडा कारागृहातून तळोजा जेलमध्ये आणले होते. पण महापौरपदावरून ओमी टीम अणि भाजपात दरी निर्माण होताच गेल्या आठवड्यात पप्पू कलानी यांना पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यात आले. या प्रकाराने कलानी कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यामुळे कलानी कुटुंब भाजपापासून दूरावल्यावर शिक्कामोर्तब झाले.भाजपातील गटतट अचानक संपुष्टातकलानी यांच्या पक्षप्रवेशावरून दोन गटांत विभागली गेलेली शहर भाजपा सध्या अचानकपणे एक झाली आहे. ओमी टीममुले सत्ता मिळेपर्यंत पक्षात दोन स्वतंत्र गट कार्यरत होते. पण शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय झाला आणि ओमी टीम, साई पक्षाचे महत्त्व संपल्याचे लक्षात येताच सर्व जण एकत्र आले आहेत. कल्याणमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपाने महापौरपदावरील दावा मागे घेतल्यानंतर शहर भाजपात आनंदीआनंद आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या