शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पाठोपाठ ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:55 IST

उल्हासनगरपाठोपाठ ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याची माहिती समोर आली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनही कमी पडत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

ठळक मुद्देश्वान दंशात ३ ते ८ वयोगटातील मुलांचा अधिक समावेशभटक्या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात

ठाणे - उल्हासनगर मध्ये भटका कुत्र्याच्या चाव्यामुळे सात मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आता प्रत्येक शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा आ वासून उभी राहिली आहे. ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही या कुत्र्यांची संख्या आजच्या घडीला लाखाच्या घरात गेली असल्याची माहितीसुध्दा एका अहवालातून समोर आली आहे.                      शुक्रवारी उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ मध्ये भटक्या कुत्र्याच्य चाव्यामुळे सात मुले जमखी झाल्याची घटना घडली आहे. परंतु एकाच वेळेस सात जणांना चावा घेतल्याने ही घटना समोर आली आहे. परंतु एखाद दुसरी घटना असती तर ती समोर आली नसती. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक जण कुत्र्याने चावा घेतल्यास ते खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेकडे उपचार घेतात. त्यांची नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ पर्यंतच कधी कधी असते. परंतु वास्तविक हा आकडा ५० ते ६० च्या घरात असल्याची माहिती भटक्या कुत्र्यांवर अभ्यास करणारे दक्ष नागरीक सत्यजीत शहा यांनी समोर आणली आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर या अश्या भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे, याच कुटुंबियातील १० वर्षीय आर्यनला मागील महिन्यात दुकानात गेला असता त्याच्या पाठीवर चढत एका भटक्या कुत्र्याने पाठीचा चावा घेतला होता. परंतु आज ही आर्यनच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी भीती कायम आहे. त्यातही लहान मुलांवरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे वाढल्याचे दिसत आहे. श्वान दंशाच्या घटनांपैकी ८० टक्के घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालकांचा समावेश असल्याचेही शहा यांनी सांगितले. ठाणे शहरात अंदाजे जवळपास एक लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाणे पालिकेचा उदासीनपणा हे सर्वात मोठे कारण समोर येत असून निर्बिजीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही आजही भटक्या कुत्र्यांची गणना मात्र पालिकेकडून झालेली नाही. मागील दिड वर्षापूर्वी या कुत्र्यांची गणना करण्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु अद्यापही या कुत्र्यांची गणना झालेली नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdogकुत्रा