शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना? अनेकांचा मृत्यू, मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:58 IST

मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

उल्हासनगर : जिल्हास्तरीय दर्जा असलेले मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला. तर रुग्णालयाने दोन पैकी एक व्हेंटिलेटर चांगले असून तंज्ञ डॉक्टर नसल्याने ते बंद असल्याचा खुलासा रुग्णालयाने केला आहे. तर गंभीर रुग्णांना ठाणे अथवा मुंबईला हलवित असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

उल्हासनगरातील आरोग्य यंत्रणेचा कसा बोजवारा उडाला हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याने रविवारी उघड झाला. दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन, शहरातील आरोग्य व्यवस्थेचा पाडा वाचला. शहरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयातील २४ पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन मध्ये गेल्याने वैद्यकीय सेवेवर ताण पडला आहे. रुग्णालयाकडे असलेल्या दोन व्हेंटिलेटर शहर पूर्वेतील कोविड रुग्णालयाला दिल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. असा आरोप मनसेने करून त्यामुळे अनेक रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे. 

मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तसेच रुग्णालयाच्या आरोग्य सुविधा बाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे संचालक आदींना पाठविल्याची माहिती दिली. रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांनी रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दोन व्हेंटिलेटर असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे. मात्र तंज्ञ डॉक्टर नसल्याने दुसरे बंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अपुरी सुखसुविधा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी असताना जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णालय सेवा देत असल्याचे डॉ जाफर तडवी म्हणाले. 

 वाढत्या रुग्णाने महापालिका प्रशासन हतबल

 शहरात गेल्या तीन दिवसात ६०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णात वाढ झाल्याने, त्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासना समोर पडला आहे. धोकादायक इमारत घोषीत केलेल्या विमा कामगार रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु असून पावसाळ्यात रुग्णालय इमारतीला गळती लागत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.