शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना? अनेकांचा मृत्यू, मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:58 IST

मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

उल्हासनगर : जिल्हास्तरीय दर्जा असलेले मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला. तर रुग्णालयाने दोन पैकी एक व्हेंटिलेटर चांगले असून तंज्ञ डॉक्टर नसल्याने ते बंद असल्याचा खुलासा रुग्णालयाने केला आहे. तर गंभीर रुग्णांना ठाणे अथवा मुंबईला हलवित असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

उल्हासनगरातील आरोग्य यंत्रणेचा कसा बोजवारा उडाला हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याने रविवारी उघड झाला. दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन, शहरातील आरोग्य व्यवस्थेचा पाडा वाचला. शहरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयातील २४ पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन मध्ये गेल्याने वैद्यकीय सेवेवर ताण पडला आहे. रुग्णालयाकडे असलेल्या दोन व्हेंटिलेटर शहर पूर्वेतील कोविड रुग्णालयाला दिल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. असा आरोप मनसेने करून त्यामुळे अनेक रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे. 

मध्यवर्ती रुग्णालय व्हेंटिलेटर विना असून अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तसेच रुग्णालयाच्या आरोग्य सुविधा बाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे संचालक आदींना पाठविल्याची माहिती दिली. रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांनी रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात दोन व्हेंटिलेटर असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे. मात्र तंज्ञ डॉक्टर नसल्याने दुसरे बंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच अपुरी सुखसुविधा व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी असताना जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णालय सेवा देत असल्याचे डॉ जाफर तडवी म्हणाले. 

 वाढत्या रुग्णाने महापालिका प्रशासन हतबल

 शहरात गेल्या तीन दिवसात ६०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णात वाढ झाल्याने, त्यांना ठेवायचे कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासना समोर पडला आहे. धोकादायक इमारत घोषीत केलेल्या विमा कामगार रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु असून पावसाळ्यात रुग्णालय इमारतीला गळती लागत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.